शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

'चाणक्य' शरद पवारांचा काँग्रेसला झटका; भाजपाविरोधी 'महाआघाडी'बाबत मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 08:21 IST

पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरेल, असं सूचक विधान करून शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्वप्नांना धक्का दिला आहे.

नवी दिल्लीः भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधून, भक्कम महाआघाडी उभी करून 2019च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का देण्याचा विचार करणाऱ्या काँग्रेसलाच अनपेक्षित झटका बसला आहे. महाआघाडी अस्तित्वात येणं शक्य नाही, असं स्पष्ट मत देशाच्या राजकारणातील 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलंय. इतकंच नव्हे तर, पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरेल, असं सूचक विधानही त्यांनी केलंय. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्वप्न धुसर झाल्याचं मानलं जातंय.

'माझ्या मते, महाआघाडी हा व्यवहार्य पर्याय नाही. आजची परिस्थिती ही 1977 सारखी आहे. तेव्हा, इंदिरा गांधी समर्थ नेत्या होत्या. देशाच्या पंतप्रधान होत्या. पण, आणीबाणीनंतर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेनं त्यांच्याविरोधात मतदान करून काँग्रेसला पराभूत केलं. त्या निवडणुकीत कुठलाही राजकीय पक्ष किंवा आघाडी नव्हती, तर निवडणुकीनंतर सगळे विजयी पक्ष एकत्र आले आणि जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर मोरारजी देसाई यांना पंतप्रधान म्हणून निवडण्यात आलं. त्यांना निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं नव्हतं. तसंच काहीसं 2019च्या निवडणुकीनंतर होऊ शकतं', असा अंदाज शरद पवार यांनी 'टाइम्स नाउ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत वर्तवला आहे. भाजपाविरोधी महाआघाडी व्हावी, असं अनेक सहकाऱ्यांना वाटतंय, पण मला हा प्रस्ताव तितकाचा पटलेला नाही. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी शरद पवार किंवा अन्य कुणाच्या नावाचा प्रश्नच येत नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं. 

आम्हाला गृहित धरू नका, असं सूचित करत माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी शुक्रवारीच विरोधकांच्या एकजुटीबाबत शंका व्यक्त केली होती. आपले पुत्र कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले, याचा अर्थ ते एकत्रित निवडणुका लढवतीलच असे नाही, असं देवेगौडा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या पाठोपाठ, शरद पवार यांनीही महाआघाडीच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वास्तविक, गेली अनेक वर्षं तिसऱ्या आघाडीचे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जात होतं. पण आता त्यांनीच निवडणूकपूर्व महाआघाडी शक्य नसल्याचं मत मांडून केंद्रातील मोदी सरकारला सुखद धक्का दिला आहे. 

उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये महाआघाडी झाल्यानं भाजपाला आपले गड गमवावे लागले होते. स्वाभाविकच, कर्नाटकमधील कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची एकी पाहून मोदी-अमित शहा जोडी काळजीत पडली होती. पण, शरद पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे, लोकसभा निवडणुकीआधी महाआघाडी अस्तित्वात न आल्यास त्यांचं राजकीय गणित तुलनेनं सोपं होऊ शकतं.       

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी