शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

'चाणक्य' शरद पवारांचा काँग्रेसला झटका; भाजपाविरोधी 'महाआघाडी'बाबत मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 08:21 IST

पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरेल, असं सूचक विधान करून शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्वप्नांना धक्का दिला आहे.

नवी दिल्लीः भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधून, भक्कम महाआघाडी उभी करून 2019च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का देण्याचा विचार करणाऱ्या काँग्रेसलाच अनपेक्षित झटका बसला आहे. महाआघाडी अस्तित्वात येणं शक्य नाही, असं स्पष्ट मत देशाच्या राजकारणातील 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलंय. इतकंच नव्हे तर, पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरेल, असं सूचक विधानही त्यांनी केलंय. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्वप्न धुसर झाल्याचं मानलं जातंय.

'माझ्या मते, महाआघाडी हा व्यवहार्य पर्याय नाही. आजची परिस्थिती ही 1977 सारखी आहे. तेव्हा, इंदिरा गांधी समर्थ नेत्या होत्या. देशाच्या पंतप्रधान होत्या. पण, आणीबाणीनंतर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेनं त्यांच्याविरोधात मतदान करून काँग्रेसला पराभूत केलं. त्या निवडणुकीत कुठलाही राजकीय पक्ष किंवा आघाडी नव्हती, तर निवडणुकीनंतर सगळे विजयी पक्ष एकत्र आले आणि जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर मोरारजी देसाई यांना पंतप्रधान म्हणून निवडण्यात आलं. त्यांना निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं नव्हतं. तसंच काहीसं 2019च्या निवडणुकीनंतर होऊ शकतं', असा अंदाज शरद पवार यांनी 'टाइम्स नाउ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत वर्तवला आहे. भाजपाविरोधी महाआघाडी व्हावी, असं अनेक सहकाऱ्यांना वाटतंय, पण मला हा प्रस्ताव तितकाचा पटलेला नाही. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी शरद पवार किंवा अन्य कुणाच्या नावाचा प्रश्नच येत नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं. 

आम्हाला गृहित धरू नका, असं सूचित करत माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी शुक्रवारीच विरोधकांच्या एकजुटीबाबत शंका व्यक्त केली होती. आपले पुत्र कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले, याचा अर्थ ते एकत्रित निवडणुका लढवतीलच असे नाही, असं देवेगौडा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या पाठोपाठ, शरद पवार यांनीही महाआघाडीच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वास्तविक, गेली अनेक वर्षं तिसऱ्या आघाडीचे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जात होतं. पण आता त्यांनीच निवडणूकपूर्व महाआघाडी शक्य नसल्याचं मत मांडून केंद्रातील मोदी सरकारला सुखद धक्का दिला आहे. 

उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये महाआघाडी झाल्यानं भाजपाला आपले गड गमवावे लागले होते. स्वाभाविकच, कर्नाटकमधील कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची एकी पाहून मोदी-अमित शहा जोडी काळजीत पडली होती. पण, शरद पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे, लोकसभा निवडणुकीआधी महाआघाडी अस्तित्वात न आल्यास त्यांचं राजकीय गणित तुलनेनं सोपं होऊ शकतं.       

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी