शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

महागठबंधन ही संधिसाधूंची अपवित्र युती, नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 11:14 IST

विरोधकांवर हल्लाबोल : आघाडीला वैैचारिक आधार नाही

चेन्नई : महागठबंधन ही संधिसाधू व सधन घराण्यांची अपवित्र युती आहे अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली आहे. स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष महागठबंधन स्थापन करीत आहे, असेही ते म्हणाले.

तामिळनाडूतल्या चेन्नई, मदुराई, तिरुचिरापल्ली, तिरुवल्लूर येथील भाजपा बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मोदींनी संवाद साधला. या महागठबंधनासाठी तेलुगू देसम पार्टी सर्वात जास्त प्रयत्नशील आहे. मुळात हा पक्ष त्याचे संस्थापक एन. टी. रामाराव यांनी काँग्रेसच्या विरोधात स्थापन केला होता; मात्र आता तेलुगू देसम पार्टीचे विद्यमान प्रमुख काँग्रेसच्या कच्छपी लागले आहेत.ते म्हणाले की, राममनोहर लोहिया यांचे विचार आपला प्रेरणास्रोत असल्याचा दावा या महागठबंधनमधील काही पक्ष करतात; मात्र लोहियांनी कायमच काँग्रेस व तिच्या विचारधारेला विरोध केला होता. काही नेत्यांनी फक्त त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महागठबंधनचा घाट घातला असून, तिला कोणताही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनी हे प्रयत्न चालविले असून, त्यांना जनकल्याणाशी काही देणेघेणे नाही. लोकांच्या नव्हे, तर वैयक्तिक आकांक्षांच्या पूर्ततेसाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत.अण्णाद्रमुकचे सरकार बरखास्त केले होतेच्मोदी म्हणाले की, महागठबंधनात सामील होऊ पाहणाऱ्यांपैकी अनेक नेत्यांना काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीच्या काळात अटक झाली होती; मात्र या नेत्यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी टाळला. काँग्रेसने सर्वांवर अन्याय केलेला आहे. त्यातून कोणीही सुटलेले नाही. जनाधार असलेले तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री व अण्णाद्रमुक पक्षाचे प्रमुख एम. जी. रामचंद्रन यांचे सरकार १९८० साली काँग्रेसने बरखास्त केले होते याचीही मोदींनी आठवण करून दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस