शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

महागठबंधन ही संधिसाधूंची अपवित्र युती, नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 11:14 IST

विरोधकांवर हल्लाबोल : आघाडीला वैैचारिक आधार नाही

चेन्नई : महागठबंधन ही संधिसाधू व सधन घराण्यांची अपवित्र युती आहे अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली आहे. स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष महागठबंधन स्थापन करीत आहे, असेही ते म्हणाले.

तामिळनाडूतल्या चेन्नई, मदुराई, तिरुचिरापल्ली, तिरुवल्लूर येथील भाजपा बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मोदींनी संवाद साधला. या महागठबंधनासाठी तेलुगू देसम पार्टी सर्वात जास्त प्रयत्नशील आहे. मुळात हा पक्ष त्याचे संस्थापक एन. टी. रामाराव यांनी काँग्रेसच्या विरोधात स्थापन केला होता; मात्र आता तेलुगू देसम पार्टीचे विद्यमान प्रमुख काँग्रेसच्या कच्छपी लागले आहेत.ते म्हणाले की, राममनोहर लोहिया यांचे विचार आपला प्रेरणास्रोत असल्याचा दावा या महागठबंधनमधील काही पक्ष करतात; मात्र लोहियांनी कायमच काँग्रेस व तिच्या विचारधारेला विरोध केला होता. काही नेत्यांनी फक्त त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महागठबंधनचा घाट घातला असून, तिला कोणताही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनी हे प्रयत्न चालविले असून, त्यांना जनकल्याणाशी काही देणेघेणे नाही. लोकांच्या नव्हे, तर वैयक्तिक आकांक्षांच्या पूर्ततेसाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत.अण्णाद्रमुकचे सरकार बरखास्त केले होतेच्मोदी म्हणाले की, महागठबंधनात सामील होऊ पाहणाऱ्यांपैकी अनेक नेत्यांना काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीच्या काळात अटक झाली होती; मात्र या नेत्यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी टाळला. काँग्रेसने सर्वांवर अन्याय केलेला आहे. त्यातून कोणीही सुटलेले नाही. जनाधार असलेले तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री व अण्णाद्रमुक पक्षाचे प्रमुख एम. जी. रामचंद्रन यांचे सरकार १९८० साली काँग्रेसने बरखास्त केले होते याचीही मोदींनी आठवण करून दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस