शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महागठबंधन ही संधिसाधूंची अपवित्र युती, नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 11:14 IST

विरोधकांवर हल्लाबोल : आघाडीला वैैचारिक आधार नाही

चेन्नई : महागठबंधन ही संधिसाधू व सधन घराण्यांची अपवित्र युती आहे अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली आहे. स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष महागठबंधन स्थापन करीत आहे, असेही ते म्हणाले.

तामिळनाडूतल्या चेन्नई, मदुराई, तिरुचिरापल्ली, तिरुवल्लूर येथील भाजपा बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मोदींनी संवाद साधला. या महागठबंधनासाठी तेलुगू देसम पार्टी सर्वात जास्त प्रयत्नशील आहे. मुळात हा पक्ष त्याचे संस्थापक एन. टी. रामाराव यांनी काँग्रेसच्या विरोधात स्थापन केला होता; मात्र आता तेलुगू देसम पार्टीचे विद्यमान प्रमुख काँग्रेसच्या कच्छपी लागले आहेत.ते म्हणाले की, राममनोहर लोहिया यांचे विचार आपला प्रेरणास्रोत असल्याचा दावा या महागठबंधनमधील काही पक्ष करतात; मात्र लोहियांनी कायमच काँग्रेस व तिच्या विचारधारेला विरोध केला होता. काही नेत्यांनी फक्त त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महागठबंधनचा घाट घातला असून, तिला कोणताही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनी हे प्रयत्न चालविले असून, त्यांना जनकल्याणाशी काही देणेघेणे नाही. लोकांच्या नव्हे, तर वैयक्तिक आकांक्षांच्या पूर्ततेसाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत.अण्णाद्रमुकचे सरकार बरखास्त केले होतेच्मोदी म्हणाले की, महागठबंधनात सामील होऊ पाहणाऱ्यांपैकी अनेक नेत्यांना काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीच्या काळात अटक झाली होती; मात्र या नेत्यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी टाळला. काँग्रेसने सर्वांवर अन्याय केलेला आहे. त्यातून कोणीही सुटलेले नाही. जनाधार असलेले तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री व अण्णाद्रमुक पक्षाचे प्रमुख एम. जी. रामचंद्रन यांचे सरकार १९८० साली काँग्रेसने बरखास्त केले होते याचीही मोदींनी आठवण करून दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस