आधी होकार, मग नकार; 'त्या' यू-टर्नमुळे कोसळणार काँग्रेस सरकार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 08:15 PM2020-03-13T20:15:00+5:302020-03-13T20:23:21+5:30

भोपाळला परतण्याच्या तयारीत असलेले आमदार विमानतळावरुन माघारी; काँग्रेसला मोठा धक्का

Madhya Pradesh mlas Will Not Return From Bangalore increases threat of congress government kkg | आधी होकार, मग नकार; 'त्या' यू-टर्नमुळे कोसळणार काँग्रेस सरकार? 

आधी होकार, मग नकार; 'त्या' यू-टर्नमुळे कोसळणार काँग्रेस सरकार? 

googlenewsNext
ठळक मुद्देभोपाळला परतण्यासाठी निघालेले आमदार विमानतळावरुन माघारीआमदारकीचा राजीनामा दिलेल्या सदस्यांचा बंगळुरूतला मुक्काम वाढलाबंगळुरूच्या विमानतळावर पोहोचलेले आमदार पुन्हा रिसॉर्टला रवाना

भोपाळ: मध्य प्रदेशमधलं सत्ता नाट्य अद्यापही सुरूच आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचा काँग्रेसला रामराम, त्यानंतर त्यांच्या समर्थक आमदारांनी दिलेले राजीनामे यामुळे राज्यातलं काँग्रेस सरकार अडचणीत सापडलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आमदार सध्या बंगळुरूत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे आमदार भोपाळला परतण्यास तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. 

सिंधिया समर्थक १९ आमदार सध्या बंगळुरूतल्या एका रिसॉर्टमध्ये आहेत. त्यांना मध्य प्रदेशात आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. आज हे आमदार भोपाळला परतण्यासाठी रिसॉर्टहून केम्पेगौडा विमानतळाच्या दिशेनं निघाले होते. मात्र तिथून ते पुन्हा रिसॉर्टवर परतले. या आमदारांना बंगळुरूहून आणण्यासाठी काँग्रेसनं पूर्ण तयारी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र विमानतळाहून आमदार पुन्हा रिसॉर्टला गेल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला. 

सरकार वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसनं आमदारांना परत आणण्यासाठी भोपाळच्या राजा भोज विमानतळावर एका विशेष बसची व्यवस्था केली होती. मात्र हे आमदार बंगळुरूतल्या विमानतळावरूनच पुन्हा रिसॉर्टला परतल्यानं ही बसदेखील रिकामी परतली. मध्य प्रदेशात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा आमदारांनी केला आहे. तशी माहिती त्यांनी मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक यांनाही कळवली आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी (१० मार्चला) त्यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामे दिले. सिंधिया यांचे १९ समर्थक आमदार सध्या बंगळुरूत आहेत. यातले सहा जण कमलनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत. या सगळ्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र यातल्या एकाचाही राजीनामा मंजूर झालेला नाही. 
 

Web Title: Madhya Pradesh mlas Will Not Return From Bangalore increases threat of congress government kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.