शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या बेटी बचाओ मोहिमेला धक्का, मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 06:45 IST

Madhya Pradesh: एनसीआरबीच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले असून, यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : एनसीआरबीच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले असून, यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

संपूर्ण राज्यात मामा म्हणून ओळख असलेले मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यावर माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी टीकास्त्र सोडले आहे. राज्यात अनेक वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून ‘बेटी बचाओ’ मोहीम सुरू करण्यात आली होती. तसेच या मोहिमेचे ते श्रेय घेत होते. तथापि, नव्याने जारी करण्यात आलेल्या एनसीआरबी अहवालात मध्य प्रदेश बेपत्ता मुलींच्या राज्यांच्या यादीत सर्वात वर आहे. २०२१मध्ये १८ वर्षांवरील ९,४०७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल (८,४७८) व तामिळनाडू (४,९१४) यांचा क्रमांक आहे. 

देशभरात ५४,९६२ अल्पवयीन मुली मानवी तस्करीला बळी पडतात किंवा शारीरिक छळाला बळी पडतात. मध्य प्रदेशात २०२०मध्ये म्हणजेच कोरोनाच्या कालावधीत ही संख्या ७,२३० होती. २०१९मध्ये ही संख्या ८,५७२ होती. 

 १७ टक्के बेपत्ता मुली   मध्य प्रदेशातीलदेशातील एकूण बेपत्ता मुलींपैकी१७ टक्के मुली राज्यातील असल्याचे तथ्य पुढे आले असून, यामुळे मध्य प्रदेशातील भाजपशासित राज्याचे दावे पोकळ ठरले आहेत. ‘लोकमत’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने सुरू करणार आहेत.

सुशासनाचा दावा पोकळ - कमलनाथकमलनाथ यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारचा सर्व स्तरांवरील सुशासनाचा दावा एनसीआरबीच्या अहवालाने खोटा ठरला आहे. प्रत्येक तीन तासांनी निरपराध अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असून, हे निषेधार्ह आहे. कमलनाथ यांनी ट्वीटमध्ये भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, राज्यात एससी, एसटी समुदायावरील अत्याचार वाढले आहेत. मुली बेपत्ता हाेण्याच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात आघाडीवर आहे. भाजपला मोठ्या प्रमाणावर मते देणाऱ्या दोन समुदायांच्या विरोधातील गुन्हे ९.३८ टक्क्यांनी वाढले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश