शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

Video: संतापजनक!; इंदूरमध्ये बेघर वृद्धांसोबत जणावरांसारखी वागणूक; ट्रकमध्ये ठासून शहराबाहेर सोडलं

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 30, 2021 12:50 IST

यासंदर्भात शुक्रवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात इंदौर नगरपालिकेची एक गाडी बेघर वृद्धांना शहराबाहेर देवास हायवेवर त्यांच्या साहित्यासह सोडण्यासाठी आली होती. मात्र, लोकांनी विरोध केल्यानंतर हीच गाडी या वृद्धांना परत गाडीत भरून घेऊन गेली.

इंदूर - देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या इंदूरमध्ये एक अशी घटना समोर आली आहे, जीने मानवतेलाच मोठा हादरा दिला आहे. मध्य प्रदेशातील या शहरात बेघर वृद्धांना जनावरांप्रमाणे ट्रकमध्ये भरून शहराबाहेर सोडण्यात आल्याची हृदयाला पार पिरवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशावरून तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे.

यासंदर्भात शुक्रवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात इंदौर नगरपालिकेची एक गाडी बेघर वृद्धांना शहराबाहेर देवास हायवेवर त्यांच्या साहित्यासह सोडण्यासाठी आली होती. मात्र, लोकांनी विरोध केल्यानंतर हीच गाडी या वृद्धांना परत गाडीत भरून घेऊन गेली. यासंदर्भात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनीही व्हिडिओ ट्विट करत हा मानतेला कलंक असल्याचे म्हटले होते. तसेच शिवराज सरकारवर निशाणाही साधला होता.

सांगण्यात येते, की नगरपालिकेचा एक ट्रक काही निराधार आणि बेघर वृद्धांना घेऊन शहराबाहेरील इंदौर-देवास हायवेवर पोहोचला. येथे नगरपालिकेचे कर्मचारी या वृद्धांना गाडीतून खाली उतरवू लागले. याच वेळी काही स्थानिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना, या वृद्धांना शहराबाहेर अशा प्रकारे हायवेवर का सोडत आहात, अशी विचारणा केली. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना काहीही उत्तर देता आले नाही. 

 

यासंपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. चौहान यांच्या आदेशानंतर उपायुक्त प्रताप सोलंकी यांच्यासह इतर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत, म्हटले आहे, 'आज इंदौरमध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून वृद्धांसोबत झालेल्या अमानवीय कृत्याची माहिती मिळाली. या प्रकरणात जबाबदार असलेल्या नगरपालिका उपायुक्तांसह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच इंदौर जिल्हाधिकार्यांना या वृद्धांची देखभाल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वृद्धांसोबत अमानवीय व्यवहार कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. माझ्यासाठी नरसेवा हीच नारायण सेवा आहे. प्रत्येक वृद्धस आदर, प्रेम आणि सन्मान मिळायला हवा. हीच आपली संस्कृती आहे आणि मानव धर्मदेखील.'

यासंदर्भात नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे, की थंडीमुळे या भिक्षूंना योग्य प्रकारे सुरक्षित स्थळी शेल्टरमध्ये हलविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यात हलगर्जीपणा झाला आहे. भविष्यात असे होऊ नये, यासाठी ठोस कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा