शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Digvijaya Singh: जातीय हिंसाचारानंतर राजकारण तापले; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यावर अटकेची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 1:24 PM

Bhopal News: रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशात मोठा हिंसाचार झाला होता, त्याप्रकरणी वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे माजी मुख्यमंत्र्यावर 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोपाळ:मध्य प्रदेशात रामनवमीला झालेला हिंसाचार थंडावला असला तरी राज्यातील राजकारण मात्र तापले आहे. राज्यातील जातीय हिंसाचारावरून काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह(Digvijaya Singh) आणि शिवराज सरकार आमने-सामने आले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या एका कथित वादग्रस्त ट्विटबद्दल आतापर्यंत 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये झालेल्या हिंसाचारावर ट्विट केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात होशंगाबादमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, ट्विट केलेला फोटो चुकीचा असेल तर मी तो काढून टाकला आहे. भाजप माझ्या विरोधात अजेंडा राबवत आहे. माझ्यावर एक लाख एफआयआर नोंदवा, मी घाबरत नाही, असे ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?रामनवमीला झालेल्या हिंसाचारानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक फोटो शेअर केला होता. त्याला खरगोनमध्ये उसळलेल्या हिंसाचाराबद्दल सांगण्यात आले होते, परंतु नंतर तो काढून टाकण्यात आला. त्यावर भाजपने दिग्विजय सिंह यांच्यावर जाणीवपूर्वक जातीय हिंसा भडकावल्याचा आरोप केला. तसेच, मध्य प्रदेश सरकारने दिग्विजय सिंह यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याची मागणीही केली.

भाजप नेते काय म्हणाले?मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांनी दिग्विजय सिंह यांना आता अटक करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ते वाचणार नाहीत, त्यांनी मोठा गुन्हा केला आहे, असे ते म्हणाले. हिंसाचारातील सामील असणाऱ्यांवर बुलडोझरने कारवाई केली जात असून, कोणत्याही दोषीला सोडले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश