शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Digvijaya Singh: जातीय हिंसाचारानंतर राजकारण तापले; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यावर अटकेची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 13:25 IST

Bhopal News: रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशात मोठा हिंसाचार झाला होता, त्याप्रकरणी वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे माजी मुख्यमंत्र्यावर 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोपाळ:मध्य प्रदेशात रामनवमीला झालेला हिंसाचार थंडावला असला तरी राज्यातील राजकारण मात्र तापले आहे. राज्यातील जातीय हिंसाचारावरून काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह(Digvijaya Singh) आणि शिवराज सरकार आमने-सामने आले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या एका कथित वादग्रस्त ट्विटबद्दल आतापर्यंत 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये झालेल्या हिंसाचारावर ट्विट केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात होशंगाबादमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, ट्विट केलेला फोटो चुकीचा असेल तर मी तो काढून टाकला आहे. भाजप माझ्या विरोधात अजेंडा राबवत आहे. माझ्यावर एक लाख एफआयआर नोंदवा, मी घाबरत नाही, असे ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?रामनवमीला झालेल्या हिंसाचारानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक फोटो शेअर केला होता. त्याला खरगोनमध्ये उसळलेल्या हिंसाचाराबद्दल सांगण्यात आले होते, परंतु नंतर तो काढून टाकण्यात आला. त्यावर भाजपने दिग्विजय सिंह यांच्यावर जाणीवपूर्वक जातीय हिंसा भडकावल्याचा आरोप केला. तसेच, मध्य प्रदेश सरकारने दिग्विजय सिंह यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याची मागणीही केली.

भाजप नेते काय म्हणाले?मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांनी दिग्विजय सिंह यांना आता अटक करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ते वाचणार नाहीत, त्यांनी मोठा गुन्हा केला आहे, असे ते म्हणाले. हिंसाचारातील सामील असणाऱ्यांवर बुलडोझरने कारवाई केली जात असून, कोणत्याही दोषीला सोडले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश