शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशमधील सरकार कुणाच्या आदेशावरून पाडले गेले? ऑडियो क्लीपमधून झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 23:56 IST

कमलनाथ सरकार पाडण्यामागे नेमकी कुणी भूमिका बजावली आणि ते नेमके कुणाच्या आदेशावरून पाडले गेले याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप तेव्हापासून सुरू आहेत. आता याबाबत मोठा गौप्यस्फोट करणारी एक ऑडियो क्लीन व्हायरल झाली आहे.

भोपाळ - कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशमध्ये सत्तेत असलेले काँग्रेसचे सरकार कोसळून आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटत आला आहे. दरम्यान, कमलनाथ सरकार पाडण्यामागे नेमकी कुणी भूमिका बजावली आणि ते नेमके कुणाच्या आदेशावरून पाडले गेले याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप तेव्हापासून सुरू आहेत. आता याबाबत मोठा गौप्यस्फोट करणारी एक ऑडियो क्लीन व्हायरल झाली आहे. या अॉडियो क्लीपमधील आवाज हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा असल्याचा दावा करण्यात येत असून, या क्लीपमधील संभाषणादरम्यान त्यांनी कुणाच्या आदेशावरून हे सरकार पाडले गेले याचा उल्लेख केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले आहे. मात्र या क्लीपच्या सत्त्यतेबाबत संबंधित वृत्तवाहिनीने पुष्टी केलेली नाही. या क्लीपमध्ये शिवराजसिंह चौहान इंदूरमधील सांवेर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित करत असून, हे सरकार कोसळले पाहिजे, असे केंद्रीय नेतृत्वाने ठरवले आहे. आता तुम्हीच सांगा की, ज्योतिरादित्य शिंदे आणि तुलसीभाई यांच्या मदतीशिवाय हे सरकार कोसळले असते का? अन्य कुठलाच मार्ग नव्हता. 

दरम्यान, ही ऑडियो क्लीप समोर आल्यानंतर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा म्हणाले की, भाजपा सुरुवातीपासूनच हे आरोप नाकारत आहे. मात्र काँग्रेसचे जे आमदार बंगळुरूला होते त्यांच्या आसपास भाजपाचे नेते दिसत होते. आता शिवराजसिंह चौहान यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या विधानामुळे काँग्रेसच्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले आहे.  तसेच भाजपाचे केंद्रीय नेतृत्व या कारस्थानात सहभागी होते, तसेच  जाणूनबुजून सरकार पाडण्यात आले. त्यासाठी शिंदे यांची मदत घेतली गेली. कारण त्यांच्या मदतीशिवाय सरकार कोसळले नसते. काँग्रेसच्या सरकारमध्ये कुठलेही मतभेद नव्हते. केवळ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यांवर षडयंत्र रचून राज्यातील लोकप्रिय सरकार पाडले गेले, असा आरोप त्यांनी केला. 

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहिलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत २२ आमदारही.काँग्रेस सोडून भाजपात आले होते. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात येऊन कोसळले होते.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

आश्चर्यच! या देशांमध्ये अजूनही धावत नाही रेल्वे

गोष्ट सहा दिवसांच्या युद्धाची; इवलासा देश ठरला होता सात राष्ट्रांना भारी

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाcongressकाँग्रेस