शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मध्य प्रदेशमधील सरकार कुणाच्या आदेशावरून पाडले गेले? ऑडियो क्लीपमधून झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 23:56 IST

कमलनाथ सरकार पाडण्यामागे नेमकी कुणी भूमिका बजावली आणि ते नेमके कुणाच्या आदेशावरून पाडले गेले याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप तेव्हापासून सुरू आहेत. आता याबाबत मोठा गौप्यस्फोट करणारी एक ऑडियो क्लीन व्हायरल झाली आहे.

भोपाळ - कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशमध्ये सत्तेत असलेले काँग्रेसचे सरकार कोसळून आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटत आला आहे. दरम्यान, कमलनाथ सरकार पाडण्यामागे नेमकी कुणी भूमिका बजावली आणि ते नेमके कुणाच्या आदेशावरून पाडले गेले याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप तेव्हापासून सुरू आहेत. आता याबाबत मोठा गौप्यस्फोट करणारी एक ऑडियो क्लीन व्हायरल झाली आहे. या अॉडियो क्लीपमधील आवाज हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा असल्याचा दावा करण्यात येत असून, या क्लीपमधील संभाषणादरम्यान त्यांनी कुणाच्या आदेशावरून हे सरकार पाडले गेले याचा उल्लेख केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले आहे. मात्र या क्लीपच्या सत्त्यतेबाबत संबंधित वृत्तवाहिनीने पुष्टी केलेली नाही. या क्लीपमध्ये शिवराजसिंह चौहान इंदूरमधील सांवेर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित करत असून, हे सरकार कोसळले पाहिजे, असे केंद्रीय नेतृत्वाने ठरवले आहे. आता तुम्हीच सांगा की, ज्योतिरादित्य शिंदे आणि तुलसीभाई यांच्या मदतीशिवाय हे सरकार कोसळले असते का? अन्य कुठलाच मार्ग नव्हता. 

दरम्यान, ही ऑडियो क्लीप समोर आल्यानंतर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा म्हणाले की, भाजपा सुरुवातीपासूनच हे आरोप नाकारत आहे. मात्र काँग्रेसचे जे आमदार बंगळुरूला होते त्यांच्या आसपास भाजपाचे नेते दिसत होते. आता शिवराजसिंह चौहान यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या विधानामुळे काँग्रेसच्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले आहे.  तसेच भाजपाचे केंद्रीय नेतृत्व या कारस्थानात सहभागी होते, तसेच  जाणूनबुजून सरकार पाडण्यात आले. त्यासाठी शिंदे यांची मदत घेतली गेली. कारण त्यांच्या मदतीशिवाय सरकार कोसळले नसते. काँग्रेसच्या सरकारमध्ये कुठलेही मतभेद नव्हते. केवळ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यांवर षडयंत्र रचून राज्यातील लोकप्रिय सरकार पाडले गेले, असा आरोप त्यांनी केला. 

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहिलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत २२ आमदारही.काँग्रेस सोडून भाजपात आले होते. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात येऊन कोसळले होते.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

आश्चर्यच! या देशांमध्ये अजूनही धावत नाही रेल्वे

गोष्ट सहा दिवसांच्या युद्धाची; इवलासा देश ठरला होता सात राष्ट्रांना भारी

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाcongressकाँग्रेस