शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

मध्य प्रदेश सरकारला धोका नाही; मुख्यमंत्री कमलनाथ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 9:34 AM

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपनेते माफियांसोबत मिळून राज्यातील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमतात असल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशातीलकाँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बुधवारी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता. मात्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हे दावे फेटाळून लावले असून सरकारला काहीही धोका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपने आधी आपलं बघावं. काँग्रेसने राज्यातील अपक्ष आमदारांसह समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांचे समर्थन मिळवले आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारला राज्यात काहीही धोका नाही, असं कमलनाथ यांनी सांगितले. काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपच्या काही नेत्यांनी जबरदस्तीने हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसच्या एका मंत्र्याने केला होता.

उच्च शिक्षणमंत्री जीतू पटवारी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी मंत्री नरोत्तम मिश्रा, भूपेंद्र सिंह आणि रामपाल सिंह यांच्यासह काही नेत्यांनी काँग्रेसच्या आमदारांना जबदरस्ती घेऊन गेले होते. त्याआधी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी देखील दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून भाजपनेते माफियांसोबत मिळून राज्यातील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमतात असल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला.