शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Lumpy Skin Disease : लम्पी त्वचारोगाचा धसका! लाखो गायींना लागण; लोकांनी भीतीपोटी दूध पिणं केलं बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:57 IST

Lumpy Skin Disease : सरकारी आकडे 45 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देत ​​असतील, पण प्रत्यक्षात मृतांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. 

देशभरात लम्पी त्वचारोगाचा कहर पाहायला मिळत आहे. गायींच्या मृत्यूमुळे ग्रामीण भागात हळहळ व्यक्त होत आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 45 हजार गायींचा लम्पी संसर्गामुळे मृत्यू झाला असून सध्या तब्बल 10 लाख 36 हजार गायींना या आजाराची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सरकारी आकडे 45 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देत ​​असतील, पण प्रत्यक्षात मृतांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. 

पश्चिम राजस्थानला बसला सर्वाधिक फटका 

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये आतापर्यंत 45 हजार 63 गायींचा लम्पी संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर 10 लाख 36 हजार गायींना याची लागण झाली असून 99 हजार गायींवर उपचार सुरू आहेत. मात्र आतापर्यंत 5 लाख 71 हजार गायी उपचारानंतर बऱ्या झाल्या आहेत. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री लालचंद कटारिया यांच्या म्हणण्यानुसार, या संसर्गाचा प्रादुर्भाव पश्चिम राजस्थानमध्ये अधिक आहे.

लम्पीमुळे गायींच्या मृत्यूवरून विरोधकांनी सरकारला घेरलं

सर्वात भयावह बाब म्हणजे मृत गायी उघड्यावर फेकल्या जात आहेत. बिकानेर आणि बारमेरमध्ये हजारो मृत गायी उघड्यावर पडलेल्या आढळल्या आहेत. कालांतराने गायींचे मृतदेह कुजत असून, त्यातून भयानक दुर्गंधी येत आहे, त्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. मृत गायींचे फोटो समोर आल्यानंतर आता विरोधकही गोवंशाचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आहेत. लम्पीमुळे गायींच्या मृत्यूवरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे.

लोकांनी दूध पिणं केलं बंद 

राजस्थान सरकारने अद्याप लम्पीला महामारी घोषित केलेले नाही, राज्य सरकार केंद्राला महामारी घोषित करण्यासाठी पत्र लिहित आहे. रोगराई पसरण्याच्या भीतीने गावातील लोकांनी दूध पिणे बंद केले आहे. त्याचबरोबर शहरातील डेअरींमध्ये दूध आणि तुपाच्या पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. हा आजार रोखणे हे राजस्थान सरकारसाठी मोठे आव्हान बनले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगcowगायmilkदूध