शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 6:55 PM

CoronaVirus : एकाच गावात गेल्या काही दिवसांत कोरोनासदृश लक्षणांमुळे जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकोरोनासदृश लक्षणांमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच लोक गावात या लक्षणांपासून ग्रस्त आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र अद्याप कोरोना संसर्गाचा धोका टळला नाही. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कोरोना स्थिती फारच गंभीर आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे लखनऊमधील एका गावात कहर केला आहे. येथील एकाच गावात गेल्या काही दिवसांत कोरोनासदृश लक्षणांमुळे जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (lucknow villages hit badly by corona second wave around 15 persons died in with covid like symptoms bakshi ka talab)

येथील बख्शीचे तालाबमधील इंदारा गावातील लोकांचा असा दावा आहे की, येथे कोरोनासदृश लक्षणांमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच लोक गावात या लक्षणांपासून ग्रस्त आहेत. इंदारा आणि कुमारवा या गावातही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. आरोग्य विभागाची एकही टीम याठिकाणी टेस्टिंगसाठी आली नाही. तसेच, कोणाही वैद्यकीय किटसुद्धा दिली नाही, असे गावातील लोकांचे म्हणणे आहे.

(कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी)

गावात स्वच्छता सुद्धा करण्यात आली नाही. कोरोना आणि कर्फ्यूमुळे लोकांना दुहेरी झटका बसत आहे, असे या गावांमधील लोकांनी म्हटले आहे. इंदारा गावचे शेतकरी अमरेंद्रसिंह भदोरिया यांनी आजतक वृत्तवाहिनीला सांगितले की, त्यांना फेब्रुवारीपासून धान्य दिले जात नाही. या कोरोना साथीमुळे त्यांचे नुकसान होत आहे. सरकारने 72 तासांच्या आत पैसे देण्याचा दावा केला, परंतु 3 महिन्यांनंतरही पैसे दिले गेले नाहीत, असे अमरेंद्रसिंह भदोरिया म्हणाले.

भीतीमुळे कुमरावातील ग्रामस्थ आपली टेस्ट करून घेत नाहीत. कुमरावा गावचे रहिवासी सौरव पांडे म्हणाले की, लोकांना रुग्णालयात दाखल केले जाईल व तेथील परिस्थिती सर्वात वाईट आहे, असे ग्रामस्थांना वाटते.  मात्र, काही जणांचे असे म्हणणे आहे की, त्यांना जो सर्दी-खोकला झाला आहे, तो केवळ व्हायरल आहे. कोरोना टेस्ट करण्याची गरज नाही. त्याचबरोबर काही जणांना असे वाटते की, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास गावात त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल. तर काही लोक कोरोना टेस्टिंगची व्यवस्था नसल्याचा आरोप करत आहेत.

30 वर्षीय अनिल, ज्यांचे मिठाईचे दुकान होते. ते कुटुंबातील एकमेव कमाई करणारे सदस्य होते. कोरोनासदृश्य लक्षणे आणि श्वास घेण्यास होत असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अनिल त्याच्या मागे एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी सोडून गेले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अश्रू हे ग्रामीण भागातील प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे सांगत होते. 'दोन दिवसांत अनिल यांना काय झाले? हे समजू शकले नाही. त्यांना औषध घेण्यासाठी एका खासगी डॉक्टरकडे जावे लागले, गावात शासनाकडून कोणतेही वैद्यकीय किट उपलब्ध झाले नाही. पण आम्ही आमच्या भावाला वाचवू शकलो नाही, असे अनिल यांच्या भावाने सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश