शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त...
2
नव्या, मोठ्या इमारतींना २४ तास पाणी, मध्यमवर्गाला तीन तास...; मांजरेकरांनी मांडला भेदभावाचा प्रश्न
3
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
4
कलयुगी लेक! प्रियकरासाठी बापाचाच काटा काढला; आईनेही दिली साथ, 'त्या' हत्येचं असं उलगडलं रहस्य
5
बनावट FASTag Annual Pass द्वारे नवीन फ्रॉड, NHAI ने दिला इशारा; कसं वाचाल, जाणून घ्या
6
"मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथं काय हवं हे कळणार नाही"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा
7
प्रेम, धोका अन् मर्डर! रेल्वे ट्रॅक शेजारी सापडलेल्या त्या मृतदेहाचा सस्पेन्स ११ महिन्यांनी संपला, सत्य ऐकून... 
8
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
9
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक आहे 'या' व्यवसायिकाची नात; कोणता आहे त्यांचा बिझनेस? जाणून घ्या
10
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"तर मी स्वतःहून बाजूला होईल"; संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे म्हणाले, "मला अधिकार नाही"
12
रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!
14
"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार
15
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
16
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
17
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
18
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
19
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
20
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 18:56 IST

CoronaVirus : एकाच गावात गेल्या काही दिवसांत कोरोनासदृश लक्षणांमुळे जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकोरोनासदृश लक्षणांमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच लोक गावात या लक्षणांपासून ग्रस्त आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र अद्याप कोरोना संसर्गाचा धोका टळला नाही. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कोरोना स्थिती फारच गंभीर आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे लखनऊमधील एका गावात कहर केला आहे. येथील एकाच गावात गेल्या काही दिवसांत कोरोनासदृश लक्षणांमुळे जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (lucknow villages hit badly by corona second wave around 15 persons died in with covid like symptoms bakshi ka talab)

येथील बख्शीचे तालाबमधील इंदारा गावातील लोकांचा असा दावा आहे की, येथे कोरोनासदृश लक्षणांमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच लोक गावात या लक्षणांपासून ग्रस्त आहेत. इंदारा आणि कुमारवा या गावातही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. आरोग्य विभागाची एकही टीम याठिकाणी टेस्टिंगसाठी आली नाही. तसेच, कोणाही वैद्यकीय किटसुद्धा दिली नाही, असे गावातील लोकांचे म्हणणे आहे.

(कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी)

गावात स्वच्छता सुद्धा करण्यात आली नाही. कोरोना आणि कर्फ्यूमुळे लोकांना दुहेरी झटका बसत आहे, असे या गावांमधील लोकांनी म्हटले आहे. इंदारा गावचे शेतकरी अमरेंद्रसिंह भदोरिया यांनी आजतक वृत्तवाहिनीला सांगितले की, त्यांना फेब्रुवारीपासून धान्य दिले जात नाही. या कोरोना साथीमुळे त्यांचे नुकसान होत आहे. सरकारने 72 तासांच्या आत पैसे देण्याचा दावा केला, परंतु 3 महिन्यांनंतरही पैसे दिले गेले नाहीत, असे अमरेंद्रसिंह भदोरिया म्हणाले.

भीतीमुळे कुमरावातील ग्रामस्थ आपली टेस्ट करून घेत नाहीत. कुमरावा गावचे रहिवासी सौरव पांडे म्हणाले की, लोकांना रुग्णालयात दाखल केले जाईल व तेथील परिस्थिती सर्वात वाईट आहे, असे ग्रामस्थांना वाटते.  मात्र, काही जणांचे असे म्हणणे आहे की, त्यांना जो सर्दी-खोकला झाला आहे, तो केवळ व्हायरल आहे. कोरोना टेस्ट करण्याची गरज नाही. त्याचबरोबर काही जणांना असे वाटते की, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास गावात त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल. तर काही लोक कोरोना टेस्टिंगची व्यवस्था नसल्याचा आरोप करत आहेत.

30 वर्षीय अनिल, ज्यांचे मिठाईचे दुकान होते. ते कुटुंबातील एकमेव कमाई करणारे सदस्य होते. कोरोनासदृश्य लक्षणे आणि श्वास घेण्यास होत असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अनिल त्याच्या मागे एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी सोडून गेले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अश्रू हे ग्रामीण भागातील प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे सांगत होते. 'दोन दिवसांत अनिल यांना काय झाले? हे समजू शकले नाही. त्यांना औषध घेण्यासाठी एका खासगी डॉक्टरकडे जावे लागले, गावात शासनाकडून कोणतेही वैद्यकीय किट उपलब्ध झाले नाही. पण आम्ही आमच्या भावाला वाचवू शकलो नाही, असे अनिल यांच्या भावाने सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश