शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 18:56 IST

CoronaVirus : एकाच गावात गेल्या काही दिवसांत कोरोनासदृश लक्षणांमुळे जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकोरोनासदृश लक्षणांमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच लोक गावात या लक्षणांपासून ग्रस्त आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र अद्याप कोरोना संसर्गाचा धोका टळला नाही. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कोरोना स्थिती फारच गंभीर आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे लखनऊमधील एका गावात कहर केला आहे. येथील एकाच गावात गेल्या काही दिवसांत कोरोनासदृश लक्षणांमुळे जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (lucknow villages hit badly by corona second wave around 15 persons died in with covid like symptoms bakshi ka talab)

येथील बख्शीचे तालाबमधील इंदारा गावातील लोकांचा असा दावा आहे की, येथे कोरोनासदृश लक्षणांमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच लोक गावात या लक्षणांपासून ग्रस्त आहेत. इंदारा आणि कुमारवा या गावातही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. आरोग्य विभागाची एकही टीम याठिकाणी टेस्टिंगसाठी आली नाही. तसेच, कोणाही वैद्यकीय किटसुद्धा दिली नाही, असे गावातील लोकांचे म्हणणे आहे.

(कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी)

गावात स्वच्छता सुद्धा करण्यात आली नाही. कोरोना आणि कर्फ्यूमुळे लोकांना दुहेरी झटका बसत आहे, असे या गावांमधील लोकांनी म्हटले आहे. इंदारा गावचे शेतकरी अमरेंद्रसिंह भदोरिया यांनी आजतक वृत्तवाहिनीला सांगितले की, त्यांना फेब्रुवारीपासून धान्य दिले जात नाही. या कोरोना साथीमुळे त्यांचे नुकसान होत आहे. सरकारने 72 तासांच्या आत पैसे देण्याचा दावा केला, परंतु 3 महिन्यांनंतरही पैसे दिले गेले नाहीत, असे अमरेंद्रसिंह भदोरिया म्हणाले.

भीतीमुळे कुमरावातील ग्रामस्थ आपली टेस्ट करून घेत नाहीत. कुमरावा गावचे रहिवासी सौरव पांडे म्हणाले की, लोकांना रुग्णालयात दाखल केले जाईल व तेथील परिस्थिती सर्वात वाईट आहे, असे ग्रामस्थांना वाटते.  मात्र, काही जणांचे असे म्हणणे आहे की, त्यांना जो सर्दी-खोकला झाला आहे, तो केवळ व्हायरल आहे. कोरोना टेस्ट करण्याची गरज नाही. त्याचबरोबर काही जणांना असे वाटते की, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास गावात त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल. तर काही लोक कोरोना टेस्टिंगची व्यवस्था नसल्याचा आरोप करत आहेत.

30 वर्षीय अनिल, ज्यांचे मिठाईचे दुकान होते. ते कुटुंबातील एकमेव कमाई करणारे सदस्य होते. कोरोनासदृश्य लक्षणे आणि श्वास घेण्यास होत असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अनिल त्याच्या मागे एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी सोडून गेले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अश्रू हे ग्रामीण भागातील प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे सांगत होते. 'दोन दिवसांत अनिल यांना काय झाले? हे समजू शकले नाही. त्यांना औषध घेण्यासाठी एका खासगी डॉक्टरकडे जावे लागले, गावात शासनाकडून कोणतेही वैद्यकीय किट उपलब्ध झाले नाही. पण आम्ही आमच्या भावाला वाचवू शकलो नाही, असे अनिल यांच्या भावाने सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश