शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

प्रेमप्रकरण ठरतेय खुनाचे तिसरे सर्वांत मोठे कारण! महाराष्ट्रातून महिलांची तस्करी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 6:51 AM

लैंगिक छळ किंवा वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी महाराष्ट्रातून ७८४ महिलांची तस्करी करण्यात आली

नवी दिल्ली : देशात महिलांवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये २०२२ मध्ये १२.३ टक्क्यांनी वाढ झाली असून, सर्वाधिक छळ हा कुटुंबातील व्यक्तींकडूनच होत आहे. भारतात प्रत्येक तासाला तीन खून होतात, यातील एक खून हा प्रेमप्रकरणातून होत असल्याचे केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून समोर आले आहे. मानवी तस्करीचे प्रमाणही २०२२ मध्ये वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

महाराष्ट्रातून महिलांची तस्करी वाढलीदेशभरात ६,०३६ मानवी तस्करीच्या घटना घडल्या असून, यात ३,५९४ महिलांचा समावेश आहे. तर २,४४२ पुरुषांचा समावेश आहे. मानवी तस्करी केलेल्यांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून १८ वर्षांवरील देशातून सर्वाधिक ७४४ महिलांची तस्करी करण्यात आली आहे. तर बिहारमधून १८ वर्षांखालील मुलांची बालकामगार म्हणून वापर करण्यासाठी सर्वाधिक तस्करी करण्यात आली आहे

वेश्याव्यवसायासाठी तस्करी कुठून? लैंगिक छळ किंवा वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी महाराष्ट्रातून ७८४ महिलांची तस्करी करण्यात आली. यानंतर तेलंगणातून ६४६ महिलांची, बिहारमधून १२६ तर आंध्र प्रदेशमधून २६० महिलांची तस्करी करण्यात आली.  चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी कर्नाटकातून ४७ जणांची तस्करी करण्यात आली.

राज्यातील पाच हजार मुले गायबदेशभरात १८ वर्षांखालील एक लाख २७ हजार ८७४ मुले गायब असून, महाराष्ट्रात एकूण पाच हजार ३९३ मुले गायब आहेत. त्यातील २,८०६ मुली आहेत. २०२२ मध्ये महाराष्ट्रातील तीन हजार ६९ मुले गायब आहेत. पश्चिम बंगालमधून सर्वाधिक १९ हजार ५४० मुले बेपत्ता आहेत.

एनसीआरबी अहवालात माहिती

  • ५८.५% बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले.
  • ५१.१% बेपत्ता झालेल्या नागरिकांना शोधण्यात देशभरात यश आले. बेपत्ता झालेल्या ४९% नागरिकांचा शोध घेण्यात पोलिसांना अपशय आले आहे. 
  • ८७.१% बेपत्ता नागरिकांना शोधण्यात केरळ पोलिसांना यश आले. त्यानंतर तेलंगणा (८६.४%), आसाम (७२.३%) या राज्यांचा क्रमांक लागतो.
  • १८.१% बेपत्ता नागरिकांना शोधण्यात ओडिशा पोलिसांना यश आले. हे देशातील सर्वाधिक कमी प्रमाण आहे.
  • ६१.८%  बेपत्ता महिलांचा शोध महाराष्ट्रात घेण्यात आला आहे.
टॅग्स :Missingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी