शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

"अजानसाठी पाकिस्तानात जा", नितीश कुमार यांच्या पार्टीच्या नेत्याचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 2:49 PM

nitish kumar party leader ajay singh : आम्ही सनातन धर्म मानणारे लोक आहोत. हनुमानावर राजकारण होता कामा नये, असे खासदार कविता सिंह म्हणाल्या. तर यादरम्यान, त्यांचे पती अजय सिंह यांनीही अजान पाकिस्तानातच व्हायला पाहिजे, असे म्हटले आहे.

सिवान : महाराष्ट्रातून सुरू झालेला लाऊडस्पीकरवर (Loudspeaker Row) अजान आणि हनुमान चालिसाचा वाद आता देशभर गाजत आहे. सिवानमधील जेडीयू खासदार कविता सिंह  (MP Kavita Singh) आणि त्यांच्या पतीनेही या वादात उडी घेतली आहे. आम्ही सनातन धर्म मानणारे लोक आहोत. हनुमानावर राजकारण होता कामा नये, असे खासदार कविता सिंह म्हणाल्या. तर यादरम्यान, त्यांचे पती अजय सिंह यांनीही अजान पाकिस्तानातच व्हायला पाहिजे, असे म्हटले आहे.

खासदार कविता सिंह आणि त्यांचे पती अजय सिंह  सोमवारी सिवानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे विधान केले. खासदार कविता सिंह म्हणाल्या की, "सनातन धर्म सर्वात आधी आला आहे. आपला धर्म सुरुवातीपासूनच पुढे आहे. तुम्ही कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवू शकता, पण जो सनातन धर्म सर्वात पुढे राहिला आहे, त्यावर राजकारण होता कामा नये. हनुमान चालीसा मन लावून वाचावी, घरी वाचावी किंवा कुठेही वाचावी, त्यावर राजकारण होता कामा नये."

काय म्हणाले अजय सिंह?याचबरोबर, या कार्यक्रमात सहभागी असलेले खासदार कविता सिंह यांचे पती आणि जेडीयू नेते अजय सिंह यांनी अजान आणि हनुमान चालीसावरून वादग्रस्त विधान केले. अजय सिंह यांनी अजान पठण करणाऱ्या लोकांना पाकिस्तानात जाण्यास सांगितले. ते म्हणाले की, "हा हनुमानाचा देश आणि पाकिस्तानचा अजान आहे. पाकिस्तानात अजान होते, कोणीही रोखायला जात नाही. हा हनुमानाचा देश आहे, इथे हनुमान चालीसा होईल. येथे हनुमानावर बंदी घालणाऱ्यांचा नायनाट होईल. जळून जातील. हनुमानावर बंदी घालणाऱ्यांची जळून राख होईल. जसे की लंका जळून राख झाली. हनुमान चालीसा शतकानुशतके म्हटली जात आहे आणि म्हटली जाईल." अजय सिंह यांनी पुढे पुनरुच्चार केला आणि सांगितले की अजान पाकिस्तानमध्येच झाली पाहिजे.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारPakistanपाकिस्तान