शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भगवान श्रीकृष्णांचा विवाहसुद्धा लव्ह जिहाद, काँग्रेस नेत्याने उधळली मुक्ताफळे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 10:59 IST

Congress: आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे बोरा यांनी उधळली होती.

आसामकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे बोरा यांनी उधळली होती. त्यानंतर वाद वाढल्यावर त्यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. आसाममधील गोलाघाट येथे झालेल्या एका तिहेरी हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना भूपेन बोरा यांनी हे विधान केलं होतं. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एफआयआर दाखल करून अटक करण्याचा इशारा बोरा यांना दिला होता.

सोमवारी गोलाघाट जिल्हात एका २५ वर्षीय युवकाने कौटुंबिक वादातून पत्नी आणि तिच्या आई-वडिलांची हत्या केली होती. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. हत्या करणारा पती हा मुस्लिम आणि पत्नी ही हिंदू असल्याने या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे म्हटले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर टीका करताना काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बोरा यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, प्रेम आणि युद्धामध्ये सारं काही माफ असतं. आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. त्यात कृष्णाचं रुक्मिणीसोबत पळून जाणं समाविष्ट आहे. महाभारत घडण्याचं मुळ काय आहे. गांधारीच्या कुटुंबीयांना तिचा धृतराष्ट्रासोबत विवाह करायचा नव्हता. भीष्म पितामहांनी त्यांचा जबरदस्तीने विवाह लावून दिला. मामा शकुनींचा भाऊ तुरुंगात होते. नंतर त्याने कौरवांचा बदला घेतला. तोसुद्धा लव्ह जिहादच आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच्या काळात विविध धर्म आणि समुदायातील लोकांमध्ये होणाऱ्या विवाहांचा राग आळवता कामा नये, असा सल्ला बोरा यांनी दिला.

मात्र बोरा यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच कुणी पोलिसांमध्ये तक्रार केली तर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल, असा इशारा दिला होता. कुणीही धार्मिक भावना दुखावता कामा नये. कुणी काय म्हटलंय हे मला माहिती नाही.  मात्र धार्मिक भावनांशी खेळ करता कामा नये. मात्र भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला या वादात ओढणं खूप निंदनीय आहे. हे सनातन धर्माविरोधात आहे, असे सरमा यांनी सुनावले.

वाद वाढल्यानंतर काँग्रेसचे नेते असलेल्या भूपेन बोरा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी सांगितले की, काल रात्री माझ्या स्वप्नात माझे आजोबा आले. त्यांनी हे वक्तव्य चुकीचं आहे, असं मला सांगितलं. त्यामुळे राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी नामघरामध्ये मातीचा दिवा आणि पानाचा विडा ठेवून देवाची माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री किंवा भाजपाच्या भीतीने मी हे करत नाही आहे, तर या विधानामुळे लोकांच्या आणि सत्राधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्याने मी हा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Assamआसामcongressकाँग्रेसLove Jihadलव्ह जिहादBJPभाजपा