शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

भगवान श्रीकृष्णांचा विवाहसुद्धा लव्ह जिहाद, काँग्रेस नेत्याने उधळली मुक्ताफळे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 10:59 IST

Congress: आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे बोरा यांनी उधळली होती.

आसामकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे बोरा यांनी उधळली होती. त्यानंतर वाद वाढल्यावर त्यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. आसाममधील गोलाघाट येथे झालेल्या एका तिहेरी हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना भूपेन बोरा यांनी हे विधान केलं होतं. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एफआयआर दाखल करून अटक करण्याचा इशारा बोरा यांना दिला होता.

सोमवारी गोलाघाट जिल्हात एका २५ वर्षीय युवकाने कौटुंबिक वादातून पत्नी आणि तिच्या आई-वडिलांची हत्या केली होती. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. हत्या करणारा पती हा मुस्लिम आणि पत्नी ही हिंदू असल्याने या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे म्हटले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर टीका करताना काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बोरा यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, प्रेम आणि युद्धामध्ये सारं काही माफ असतं. आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. त्यात कृष्णाचं रुक्मिणीसोबत पळून जाणं समाविष्ट आहे. महाभारत घडण्याचं मुळ काय आहे. गांधारीच्या कुटुंबीयांना तिचा धृतराष्ट्रासोबत विवाह करायचा नव्हता. भीष्म पितामहांनी त्यांचा जबरदस्तीने विवाह लावून दिला. मामा शकुनींचा भाऊ तुरुंगात होते. नंतर त्याने कौरवांचा बदला घेतला. तोसुद्धा लव्ह जिहादच आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच्या काळात विविध धर्म आणि समुदायातील लोकांमध्ये होणाऱ्या विवाहांचा राग आळवता कामा नये, असा सल्ला बोरा यांनी दिला.

मात्र बोरा यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच कुणी पोलिसांमध्ये तक्रार केली तर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल, असा इशारा दिला होता. कुणीही धार्मिक भावना दुखावता कामा नये. कुणी काय म्हटलंय हे मला माहिती नाही.  मात्र धार्मिक भावनांशी खेळ करता कामा नये. मात्र भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला या वादात ओढणं खूप निंदनीय आहे. हे सनातन धर्माविरोधात आहे, असे सरमा यांनी सुनावले.

वाद वाढल्यानंतर काँग्रेसचे नेते असलेल्या भूपेन बोरा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी सांगितले की, काल रात्री माझ्या स्वप्नात माझे आजोबा आले. त्यांनी हे वक्तव्य चुकीचं आहे, असं मला सांगितलं. त्यामुळे राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी नामघरामध्ये मातीचा दिवा आणि पानाचा विडा ठेवून देवाची माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री किंवा भाजपाच्या भीतीने मी हे करत नाही आहे, तर या विधानामुळे लोकांच्या आणि सत्राधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्याने मी हा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Assamआसामcongressकाँग्रेसLove Jihadलव्ह जिहादBJPभाजपा