शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 09:50 IST

Loksabha ELection - कलम ३७०, बहुमताचा गैरवापर यासारख्या विविध मुद्द्यांवरून अमित शाह यांनी विरोधकांचे आरोप खोडले आहेत. 

नवी दिल्ली - Amit Shah on INDIA Allaince ( Marathi News ) विरोधकांना देशात अस्थिर सरकार हवंय, संपूर्ण देशात जनतेचा या लोकांवर विश्वास नाही. इंडिया आघाडीतल्या एका नेत्यानं सांगितलं, आम्ही दरवर्षी एक एक पंतप्रधान आणू. या देशात स्थिर सरकारने किती फायदे झाले हे जनतेला माहिती आहे. अस्थिर सरकारमुळे होणारं नुकसान देशानं भोगलंय. दीड पिढ्या पुढे गेल्या. गेली २ टर्म मोदींच्या नेतृत्वात देशाला स्थिर सरकार मिळालंय, पुढील टर्मही मोदींच्या नेतृत्वावर जनता विश्वास ठेवेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. 

अमित शाह म्हणाले की, आमच्याकडे गेल्या १० वर्षापासून बहुमत आहे. परंतु संविधान बदलण्याबाबत राहुल गांधी जे सांगतायेत त्यावर देश विश्वास ठेवत नाही. संविधान बदलण्यासाठी आमच्याकडे बहुमत आहे हे देशाला माहिती आहे. आम्ही कधीही त्याचा दुरुपयोग नाही. आम्हाला ४०० जागा नक्कीच हव्यात, आम्हाला राजकारणात स्थिरता आणायची आहे. ४०० जागा भारताच्या सुरक्षेला सुरक्षित ठेवण्यासाठी हव्यात. देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकांची बनवण्यासाठी आम्हाला ४०० जागा हव्यात. आजही अनेक घरात शुद्ध पाणी पोहचवणं बाकी आहे त्यासाठी आम्हाला ४०० जागा हव्यात. ७० वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मोफत उपचार देता येतील यासाठी आम्हाला ४०० जागा हव्यात असं त्यांनी सांगितले. ANI ला शाह यांनी विशेष मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते. 

तसेच आम्ही ४०० जागांच्या बहुमताचा वापर गेल्या १० वर्षात कलम ३७० हटवण्यासाठी केला, तिहेरी तलाक रद्द केले. राम मंदिर बनवलं, समान नागरी कायदा आणला. आमच्या ४०० जागा नव्हत्या परंतु पुरेसे बहुमत होते. या बहुमताचा वापर संविधान सभेने देशाला जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी १० वर्ष केला. २७२ आणि ४०० जागा याने फरक पडत नाही. बहुमताच्या दुरुपयोगाचा इतिहास आमच्या पक्षाचा नाही. इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसनं केला. संविधानात बदल केले, लोकसभेचा कार्यकाळ वाढवला. आणीबाणी आणली. कुठल्याही कारणास्तव सव्वा लाख लोकांना १९ महिने जेलमध्ये बंद केले असा आरोप अमित शाह यांनी काँग्रेसवर केला आहे.

दरम्यान, जे कलम ३७० वर प्रश्नचिन्ह उभे करतात, त्यांनी काश्मीरमध्ये १४ टक्क्यांवरून मतदान ४० टक्के पार केलंय यापेक्षा मोठं यश कलम ३७० रद्द केल्याचं आहे. सर्व फुटिरतावादी नेते आज मतदान करतायेत. मत कुणाला द्यायचे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु लोकशाही प्रक्रियेचा ते भाग बनले. आधी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या घोषणा दिल्या जायच्या मात्र आज शांततापूर्वक, कुठेही हिंसाचार न होता लोकांनी मतदान केले. हा बदल काश्मीरमध्ये घडलाय. पहिल्यांदा ४० टक्क्याहून अधिक विस्थापित काश्मीर पंडितांनी मतदान केले. हा आकडा आजपर्यंत ३ टक्क्यांच्या वर गेला नव्हता. आपण लोकशाहीसोबत जाऊ शकतो असा विश्वास काश्मिरी जनतेमध्ये आला असंही अमित शाह यांनी म्हटलं.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीArticle 370कलम 370congressकाँग्रेस