शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 09:50 IST

Loksabha ELection - कलम ३७०, बहुमताचा गैरवापर यासारख्या विविध मुद्द्यांवरून अमित शाह यांनी विरोधकांचे आरोप खोडले आहेत. 

नवी दिल्ली - Amit Shah on INDIA Allaince ( Marathi News ) विरोधकांना देशात अस्थिर सरकार हवंय, संपूर्ण देशात जनतेचा या लोकांवर विश्वास नाही. इंडिया आघाडीतल्या एका नेत्यानं सांगितलं, आम्ही दरवर्षी एक एक पंतप्रधान आणू. या देशात स्थिर सरकारने किती फायदे झाले हे जनतेला माहिती आहे. अस्थिर सरकारमुळे होणारं नुकसान देशानं भोगलंय. दीड पिढ्या पुढे गेल्या. गेली २ टर्म मोदींच्या नेतृत्वात देशाला स्थिर सरकार मिळालंय, पुढील टर्मही मोदींच्या नेतृत्वावर जनता विश्वास ठेवेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. 

अमित शाह म्हणाले की, आमच्याकडे गेल्या १० वर्षापासून बहुमत आहे. परंतु संविधान बदलण्याबाबत राहुल गांधी जे सांगतायेत त्यावर देश विश्वास ठेवत नाही. संविधान बदलण्यासाठी आमच्याकडे बहुमत आहे हे देशाला माहिती आहे. आम्ही कधीही त्याचा दुरुपयोग नाही. आम्हाला ४०० जागा नक्कीच हव्यात, आम्हाला राजकारणात स्थिरता आणायची आहे. ४०० जागा भारताच्या सुरक्षेला सुरक्षित ठेवण्यासाठी हव्यात. देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकांची बनवण्यासाठी आम्हाला ४०० जागा हव्यात. आजही अनेक घरात शुद्ध पाणी पोहचवणं बाकी आहे त्यासाठी आम्हाला ४०० जागा हव्यात. ७० वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मोफत उपचार देता येतील यासाठी आम्हाला ४०० जागा हव्यात असं त्यांनी सांगितले. ANI ला शाह यांनी विशेष मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते. 

तसेच आम्ही ४०० जागांच्या बहुमताचा वापर गेल्या १० वर्षात कलम ३७० हटवण्यासाठी केला, तिहेरी तलाक रद्द केले. राम मंदिर बनवलं, समान नागरी कायदा आणला. आमच्या ४०० जागा नव्हत्या परंतु पुरेसे बहुमत होते. या बहुमताचा वापर संविधान सभेने देशाला जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी १० वर्ष केला. २७२ आणि ४०० जागा याने फरक पडत नाही. बहुमताच्या दुरुपयोगाचा इतिहास आमच्या पक्षाचा नाही. इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसनं केला. संविधानात बदल केले, लोकसभेचा कार्यकाळ वाढवला. आणीबाणी आणली. कुठल्याही कारणास्तव सव्वा लाख लोकांना १९ महिने जेलमध्ये बंद केले असा आरोप अमित शाह यांनी काँग्रेसवर केला आहे.

दरम्यान, जे कलम ३७० वर प्रश्नचिन्ह उभे करतात, त्यांनी काश्मीरमध्ये १४ टक्क्यांवरून मतदान ४० टक्के पार केलंय यापेक्षा मोठं यश कलम ३७० रद्द केल्याचं आहे. सर्व फुटिरतावादी नेते आज मतदान करतायेत. मत कुणाला द्यायचे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु लोकशाही प्रक्रियेचा ते भाग बनले. आधी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या घोषणा दिल्या जायच्या मात्र आज शांततापूर्वक, कुठेही हिंसाचार न होता लोकांनी मतदान केले. हा बदल काश्मीरमध्ये घडलाय. पहिल्यांदा ४० टक्क्याहून अधिक विस्थापित काश्मीर पंडितांनी मतदान केले. हा आकडा आजपर्यंत ३ टक्क्यांच्या वर गेला नव्हता. आपण लोकशाहीसोबत जाऊ शकतो असा विश्वास काश्मिरी जनतेमध्ये आला असंही अमित शाह यांनी म्हटलं.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीArticle 370कलम 370congressकाँग्रेस