शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 17:05 IST

loksabha Election Result - यंदाच्या लोकसभेत असे अनेक छोटे पक्ष होते, ज्यांनी ना एनडीएला पाठिंबा दिला, ना इंडिया आघाडीत सहभागी झाले. या पक्षांमुळे इंडिया आघाडीचं मात्र ९ जागांवर नुकसान झालं. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीनं एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरवत जोरदार मुसंडी मारली. भलेही ते बहुमताच्या आकड्यापासून दूर असले तरीही विरोधकांच्या या कामगिरीनं सत्ताधारी भाजपाची दमछाक केली. आकड्यांचा विचार केला तर आणखी ९ जागा विरोधक सहज जिंकले असते कारण याठिकाणी अत्यंत कमी मताधिक्य होते.

विरोधक कमीत कमी ९ जागा आणखी जिंकू शकले असते कारण या मतदारसंघात विरोधकांच्या गाडीला तिसऱ्या पक्षांनी ब्रेक लावला. भाजपाविरोधी मते यात विभागली गेली त्यामुळे त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला आणि इंडिया आघाडीच्या पक्षांना पराभव सहन करावा लागला. 

वंचित बहुजन आघाडी सोबत असती तर...

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात एकही जागा जिंकली नाही. परंतु कमीत कमी चार अशा जागा आहेत जिथे भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांना त्याचा फायदा झाला. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांचा विचार केला तर अकोला, बुलढाणा, हातकणंगले आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना जिंकण्याची संधी होती. 

मुंबई उत्तर पश्चिम - मताधिक्य - ४८ - वंचितला मिळालेली मते - १००५२हातकणंगले - मताधिक्य - १३४२६ - वंचितला मिळालेली मते - ३२६९६बुलढाणा - मताधिक्य २९४७९ - वंचितला मिळालेली मते - ९८४४१अकोला - मताधिक्य ४०६२६ - वंचितला मिळालेली मते - २७६७४७

बहुजन समाज पार्टीमुळेही इंडिया आघाडीला ३ जागांवर फटका

जयपूर ग्रामीण ( राजस्थान ) - मताधिक्य १६१५ - बसपाला मिळालेली मते - ३८५०कांकेर ( छत्तीसगड ) - मताधिक्य १८८४ - बसपाला मिळालेली मते - ११७७०मोरेना ( मध्य प्रदेश ) मताधिक्य ५२५३० - बसपाला मिळालेली मते - १७९६६९

AIDUF या छोट्या पक्षामुळे एका जागेवर नुकसान 

करीमगंज ( आसाम ) - मताधिक्य १८३६० - All India United Democratic Front ची मते - २९२०५

इंडियन नॅशनल लोक दलानेही एका जागेवर फटका

कुरुक्षेत्र ( हरियाणा )  - मताधिक्य २९०२१ - INLD पक्षाला मिळालेली मते ७८७०८ 

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विजय मिळवणारी शिवसेना आणि दुसऱ्या नंबरवर उबाठा यांच्यात मताधिक्य केवळ ४८ मतांचे आहे. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीने १० हजारपेक्षा अधिक मते मिळवली आहेत ज्याचा फायदा इंडिया आघाडीला झाला असता. हातकणंगले येथेही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १३४२६ मतांनी पराभूत व्हावे लागले आहे. त्याठिकाणी वंचितला ३२ हजार ६९६ मते मिळाली आहेत. 

अकोला येथे काँग्रेस उमेदवाराला भाजपानं ४० हजार ६२६ मतांनी हरवलं आहे. तिथे प्रकाश आंबेडकर हे स्वत: उभे होते. या मतदारसंघात वंचितला २ लाख ७७ हजार मते पडली. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होती. मात्र ६ जागांच्या मागणीमुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकली नाही.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस