शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 10:47 IST

Loksabha ELection 2024 - उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी झाली असून त्याठिकाणी राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत भाजपावर निशाणा साधला.

गाझियाबाद - Rahul Gandhi on BJP ( Marathi News ) ही निवडणूक विचारधारेची आहे. भाजपा संविधान संपवणार आहे. संविधान वाचवण्याची ही निवडणूक असून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात राहुल गांधी म्हणाले की, एकीकडे भाजपा आणि RSS संविधान, लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करतेय. या निवडणुकीत २-३ मोठे मुद्दे आहेत. बेरोजगारी, महागाई हे सर्वात मोठे मुद्दे आहेत. परंतु लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजपा करते. ना पंतप्रधान, ना भाजपा या मुद्द्यावर बोलतेय. इलेक्टोरल बॉन्ड जर योग्य होता मग सुप्रीम कोर्टाने ते रद्द का केले? ज्या लोकांनी भाजपाला हजारो कोटी रुपये दिले, ते लपवले का? ज्यांना कंत्राटे दिली जातात त्यांच्याकडून भाजपाला कोट्यवधीची देणगी येते असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मी जागांबाबत भविष्यवाणी करत नाही. १५-२० दिवसांपूर्वी मला वाटत होते, भाजपा १८० जागा जिंकेल. परंतु आता १५० जागा भाजपाला मिळतील असं वाटतं. आम्हाला प्रत्येक राज्यातून इंडिया आघाडी मजबूत होतेय असा रिपोर्ट मिळतोय. उत्तर प्रदेशात आमची आघाडी असून ती चांगली कामगिरी करेल असंही राहुल गांधींनी म्हटलं.

दरम्यान, भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी असून आश्वासनेही फोल ठरली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. विकासाची स्वप्ने दाखवली तीदेखील अर्धवट आहेत. इलेक्टोरल बॉन्डनं भाजपाचा बॅन्ड वाजवला आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांसाठी भाजपा सुरक्षित स्थळ आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना भाजपाने सोबत घेतले. भाजपाने अनेक लोकांचे भवितव्य अंधारात टाकलं आहे अशी टीका अखिलेश यादव यांनी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी