शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

राष्ट्रवाद आणि हिंदुत्व नव्हे, तर जात मतदारांवर सर्वाधिक टाकतेय प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 8:39 AM

मंगळसूत्र बनला निवडणूक मुद्दा, केवळ उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये जात मतदारांवर सर्वाधिक प्रभाव टाकताना दिसत आहे

संजय शर्मा नवी दिल्ली : निवडणुकीत राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हे निवडणुकीचे मुद्दे बनताना दिसत नाहीत. मतदार अजूनही जातीबाबत अधिक जागरूक आहेत. निवडणूक आणि मतदान या दोन्हींवर जातीवादाचे वर्चस्व आहे. 

अब की बार ३७० पार आणि एनडीए के साथ ४०० पार या घोषणा भाजपने दिल्या. पण, दुसऱ्या टप्प्यापूर्वी यावरून काळजी वाढली आहे. २०१९ च्या निवडणुकांप्रमाणेच खूप प्रयत्न करूनही निवडणुका राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येत नाहीत.  आतापर्यंत जे कल आले आहेत, त्यावरून असे दिसून येत आहे की, जातीवादाचा प्रभाव मतदारांवर अधिक प्रमाणात आहे. 

निवडणुकीत नेमका मुद्दा काय चालतोय?केवळ उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये जात मतदारांवर सर्वाधिक प्रभाव टाकताना दिसत आहे. राष्ट्रीय मुद्दे सीएए, एनआरसी, राष्ट्रीय सुरक्षा, पाकिस्तान, कलम ३७०, समान नागरी कायदा, देशाचा विकास, जी २० हे अद्याप निवडणुकीचे मुद्दे बनलेले नाहीत. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांमध्ये राम मंदिर अग्रस्थानी होते, पण आजपर्यंत राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनलेला नाही. त्याऐवजी, यादव, जाट, गुर्जर, मीणा, राजपूत, कुशवाह, कुर्मी, जाटव, रेड्डी, लिंगायत, वोकलिंगा समाजातील असणे हा एक मोठा मुद्दा बनला आहे. हा मुद्दा मतदारांना थेट उमेदवारांशी जोडणारा आहे, असे चित्र पहायला मिळत आहे.

भाजप म्हणते काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लीम लीगचाकाँग्रेसच्या जाहीरनाम्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप मुस्लीम लीगचा जाहीरनामा म्हणत आहे. काँग्रेस लोकांचे सोने, चांदी आणि मंगळसूत्रही हिसकावून घेईल, असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत. सॅम पित्रोदा यांनी वारसा कर लागू करण्याच्या वक्तव्यानंतर भाजपला काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची जोरदार संधी मिळाली आहे.

भाजपकडे मोठा मुद्दा...मंगळसूत्र आणि मालमत्ता वाटप हे दोन्ही निवडणुकीचे मुद्दे बनले आहेत. काँग्रेसने सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याला वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. मात्र, यामुळे निवडणुकीच्या काळात भाजपच्या हाती मोठा मुद्दा मिळाला आहे. याचे भांडवल करण्याची सर्व नेत्यांची तयारी सुरू आहे. भाजपचे सर्व केंद्रीय मंत्री, नेते एकाच सुरात काँग्रेसच्या या विधानाचा विरोध करत आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा