शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

Lokmat Parliamentary Awards: तातडीनं होणारा न्याय आणि न्यायाला होणारा विलंब; दोन्ही लोकशाहीसाठी घातकच- उपराष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 10:13 PM

हैदराबाद  बलात्कार प्रकरणात करण्यात आलेल्या एन्काऊंटरच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींचं विधान

नवी दिल्ली: न्यायदानास होणारा विलंब लोकशाहीसाठी घातक आहे. मात्र त्यामुळे तातडीनं दिल्या जाणाऱ्या न्यायाचं समर्थन करता येणार नाही. देशात सर्वकाही घटनेनुसार व्हायला हवं, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी केलं आहे. हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची अतिशय निर्घृणपणे हत्या करणाऱ्या चार आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये तातडीनं न्याय देण्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नायडूंनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात उपराष्ट्रपतींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.देश घटनेनुसार चालावा यासाठी माध्यमांपासून न्यायालयापर्यंत सर्वांनी सोबत काम करण्याची गरज असल्याचं मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं. प्रत्येक क्षेत्रानं घटनेचं पालन करायला हवं. सध्या देशात तातडीनं न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र तुम्ही तातडीनं न्याय देऊ शकत नाही आणि विलंबानं न्यायदान करणंदेखील योग्य नाही. तात्काळ न्याय आणि न्यायदानातील विलंब या दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत, असं नायडू म्हणाले. तुम्हाला गुन्हा नोंदवावा लागेल, त्याचा तपास पूर्ण व्हायला हवा, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण व्हायली हवी. यंत्रणा अशाच प्रकारे काम करते आणि हीच पद्धत योग्य आहे, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. आपण घटनेनुसार चालणाऱ्या देशात राहतो. त्यामुळे आपण संपूर्ण प्रक्रियेचं पालन करायला हवं. घाईघाईनं एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचणं योग्य नाही. मात्र निर्णयास विलंब होणंदेखील चुकीचं आहे. त्यामुळे न्यायदान करताना होणारा उशीर टाळायला हवा, असं मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं. माध्यमांनी टीआरपीच्या स्पर्धेत न धावता बातमी आणि विचार यांच्यामधील अंतर समजून घ्यायला हवं, असं आवाहन त्यांनी केलं. सर्वसामान्यांनी खोट्या बातम्यांपासून सतर्क राहण्याची गरजदेखील त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूhyderabad caseहैदराबाद प्रकरण