शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 06:59 IST

या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात, शिवसेनेला १७ ते १८ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. 

आदेश रावल -नवी दिल्ली : काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. आघाडी समितीने त्यासाठी आधी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि नंतर जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविला.

या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात, शिवसेनेला १७ ते १८ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. 

जागा किती हा विषय नंतरचाकाँग्रेस-राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक अशाप्रकारे एफआरपीचे तुकडे केले. भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड केली. रस्त्यालगत जमिनीचा शेतकऱ्यांना चार ते पाच पट मोबदला मिळायचा त्या कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळे याचे नेमके काय करणार याचे स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही. जागा किती हा विषय नंतरचा आहे.  - राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

दृष्टिकोन बदलला?भाजपविरोधात एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी अनेक निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढवल्या आहेत. तेव्हाचे जागावाटप बघता काँग्रेसचा दृष्टिकोन बदलला असेल तर आम्हाला माहित नाही. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कुठे ठरला जागांचा फॉर्म्युला?काँग्रेसचे संयोजक मुकुल वासनिक, सलमान खुर्शिद, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, मोहन प्रकाश या आघाडी समितीने देशातील प्रदेश काँग्रेस नेत्यांशी २९-३० डिसेंबर या दोन दिवसांमध्ये चर्चा केली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी २७ जागांची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र जागावाटपाच्या वाटाघाटीची सुरुवात २१-२२ जागांपासून सुरू करण्यात येणार आहे. चर्चेअंती दोन-तीन जागांवर पाणी सोडण्यासही पक्ष तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभेची तयारी सुरू; राष्ट्रवादीस कमी जागा, आंबेडकर, शेट्टींना स्थान ‘वंचित’बाबत खरगे निर्णय घेतील. प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा व्हावी, असे शरद पवार यांचे मत होते; पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे घेतील. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशीच चर्चा करा.

यावरून खलबतेजागावाटपात मिलिंद देवरा यांची मुंबईतील जागा अडकली आहे. येथे शिवसेनेचे खासदार आहेत. राजू शेट्टी यांच्या पक्षाला एक जागा देण्यात येणार असली, तरी ही जागा काँग्रेसच्या कोट्यातून कमी करण्यात येईल.

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेlok sabhaलोकसभा