शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:28 IST

द्वेषाचे राजकारण, नोटाबंदी, जीएसटीचा बसला फटका

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक पट्ट्यातील निकाल म्हणजे २०१९ च्या निवडणुकांसाठी भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. तेलंगणात काँग्रेसला यश मिळाले नसले आणि मिझोरममध्ये असलेली सत्ता हातातून गेली असली, तरी ‘अजेय’ भाजपाला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभूत केले जाऊ शकते, असे या निकालांनी दाखवून दिले आहे. यापैकी मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये सलग १५ वर्षे भाजपाचीच सत्ता होती.शिवराज सिंह यांच्यामागे रा. स्व. संघाने आपली सारी ताकद लावूनही त्याचा उपयोग झाला नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भव्य विजय मिळविला हे या निवडणुकीतील आश्चर्य आहे. कारण याची अपेक्षा नव्हती. अजित जोगी आणि बसपाची आघाडी काँग्रेसच्या मतात घट करेल, असे बोलले जात होते, पण याच्या उलट झाले. या ९० सदस्यांच्या विधानसभेत बसपा आणि जोगी यांच्या आघाडीला फक्त ९ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपा जेमतेम १५ जागांवर आला असून, काँग्रेसने तब्बल ६३ जागांवर विजय मिळविला आहे. राजस्थानातही भाजपाने २०१४ मध्ये लोकसभेच्या सर्व २५ जागा जिंकल्या होत्या, पण आज परिस्थिती बदलली आहे.सार्वत्रिक निवडणुका सहा महिन्यांवर आल्या असताना, हिंदी भाषिक आणि गायीचा मुद्दा चर्चिला गेलेल्या २२४ लोकसभा जागांवरून ही लढाई सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने या दहा राज्यांतून १७४ जागा जिंकल्या होत्या. या निकालांच्या आदल्या दिवशी, सोमवारी २१ विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. आता ते आणखी मजबूत होतील. बसपा व सपाचे नेते बैठकीला नव्हते. तेही आता सोबत येऊ शकतील. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी संकेत दिले आहेत की, राहुल गांधी यांनी अडथळे त्यांच्यासह काम करण्यात येणारे मतभेद दूर केले आहेत. एकत्र आलेल्या या २१ पक्षांचा हाच उद्देश आहे आणि तो म्हणजे आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव करणे. कारण नरेंद्र मोदी आता अजेय राहिलेले नाहीत.धार्मिक ध्रुवीकरणाने मते आकर्षित होणार नाहीतभाजपाला वाटते की, राम मंदिराच्या मुद्द्याने मध्य प्रदेशातील घसरण रोखण्यास मदत झाली, पण पक्षातील एका वर्गाला असेही वाटते की, मोदींनी विकास अजेंड्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. धार्मिक धु्रवीकरणाने मते आकर्षित होणार नाहीत. ‘लिंचिंग’च्या घटनांमुळे भलेही हिंदुत्ववादी खुश झाले असतील, पण सरकारवर नाराज असलेल्या लोकांचे मतपरिवर्तन करण्यास याची मदत झाली नाही. द्वेष पसरविणारे योगी आदित्यनाथही अपयशी ठरले. त्यांनी असंख्य सभा घेतल्या. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, या विजयाने विरोधकांच्या एकीला मोठी उभारी मिळाली आहे. यातून नवा अध्याय लिहिला जाईल.जनता मग्रुरी सहन करीत नाही : पवारजनता कधीच गुर्मी,मग्रुरी सहन करीत नाही, असे या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chhattisgarhछत्तीसगडRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी