शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 10:28 IST

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील प्रचार सुरू आहे. ४ जूनला देशाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती असतील याची प्रतिक्षा सर्वांना लागून राहिली आहे. 

नवी दिल्ली - सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे भाजपाच्या मतांमध्ये प्रत्येक निवडणुकीत वाढ होतेय. २००९ मध्ये मतांची टक्केवारी १९ टक्के होती. २०१४ मध्ये हा आकडा ३४ टक्क्यांवर आला. २०१९ च्या निवडणुकीत ३७.५ टक्के मते भाजपाला मिळाली. यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी ४२ टक्के किंवा त्याहून अधिक वाढतील. मी १२ राज्यांचा दौरा केला आहे. सर्व क्षेत्रातील विविध वयातील लोकांसोबत बोललोय. भाजपाचं ३७० चं टार्गेट सहज आलं नाही. त्यामागे विचार आणि विश्लेषण केलंय असं केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं.

एस जयशंकर म्हणाले की, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये मतांची टक्केवारी आणि लोकसभेच्या जागा वाढतील. भाजपा अत्यंत प्रोफेशनल आणि गांभीर्याने विचार करणारा पक्ष आहे. केवळ अंदाज लावत नाही. भाजपा त्यांच्या मतदारसंघात बूथपर्यंत आढावा घेते. आमची रणनीती बूथवरील फॅक्टसवर असते. त्यामुळे जर कुणी काही विशेष राज्यात मते आणि जागा वाढतील बोलत असेल तर त्यावर विश्वास करू शकतो असं लॉजिक त्यांनी मांडलं. 

तसेच पंतप्रधान मोदींनी ४०० पार नारा असाच दिला नाही. काहीतरी विचार असेल, अनेक अशी राज्यं आहेत जिथे भाजपा त्यांची ताकद आणखी मजबूत करणार आहे. आम्हाला मागच्या वेळी जितक्या जागा मिळाल्या त्याहून अधिक जागा तिथे मिळतील. बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, यूपी आणि तामिळनाडू या राज्यात आमच्या जागांमध्ये वाढ होईल असा विश्वास एस जयशंकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एकीकडे भारताच्या विकासाचं स्वप्न आम्ही दाखवत आहोत तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील पक्ष लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. मोदी सरकारच्या मागील १० वर्षात फक्त ट्रेलर होता आणि हे विधान हलक्यात कुणी घेऊ नये. जनतेसमोर भाजपाच्या १० वर्षाचा रेकॉर्ड आहे आणि भविष्यातील सकारात्मक प्रतिमा आहे. त्यामुळे आम्हाला किती जागा मिळतील याचा आकडा मी सांगू शकत नाही परंतु तो नक्कीच जास्त असेल असं आत्मविश्वासानं मी सांगू शकतो असंही एस जयशंकर यांनी म्हटलं.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीS. Jaishankarएस. जयशंकर