शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 19:49 IST

Rahul Gandhi Prayagraj Rally: 'पंतप्रधान मोदींनी 22 लोकांना अब्जाधीश बनवले, पण आम्ही करोडो लोकांना करोडपती बनवू.'

Rahul Gandhi On Agniveer Scheme: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी देशभरात प्रचार करत आहेत. दरम्यान, आज(19 मे) त्यांनी अत्यंत महत्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जाहीर सभा घेतली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादवही त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. उत्तर प्रदेशात भाजप फक्त एक जागा जिंकेल, असा टोला राहुल यांनी लगावला. 

'अग्नवीर योजना कचऱ्यात फेकणार'राहुल गांधींनी लष्करातील भरती प्रक्रियेसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निवीर योजनेबाबत भाष्य केले. आमचे सरकार आल्यावर अग्नीवीर योजना कचऱ्यात फेक आणि त्यांना कायमस्वरुपी नोकऱ्या देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, आम्ही हळूहळू गरीब आणि बेरोजगार लोकांच्या खात्यात पैसे जमा करू, असेही ते म्हणाले.

'संविधान वाचवण्याची लढाई'ही संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. भाजप आणि आरएसएसचे लोक सातत्याने संविधानावर हल्ले करत आहेत, पण मी त्यांना सांगू इच्छितो की, कोणतीही शक्ती राज्यघटना नष्ट करू शकत नाही. भाजप आणि नरेंद्र मोदींनी फक्त उद्योगपती मित्रांसाठी काम केले, पण आमचे सरकार आले तर आम्ही गरिबांसाठी काम करू, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

'करोडो करोडपती निर्माण करणार'राहुल पुढे म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 लोकांना अब्जाधीश बनवले, पण आम्ही करोडो लोकांना करोडपती बनवणार आहोत. गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये जमा करू. शेतकऱ्यांना MSP देऊन त्यांची कर्जे माफ केली जातील. प्रत्येक शिक्षित तरुणाला नोकरी दिली जाईल. मनरेगा अंतर्गत मजुरांचे वेतन 250 वरुन 400 रुपये करू, असे आश्वासनदेखील राहुल गांधींनी दिले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस