शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 17:42 IST

Lok Sabha Elections 2024 Amit Shah And Congress : अमित शाह यांनी गुरुवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. पक्षाचे 'राजपुत्र' राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रे'ने निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती, परंतु त्याचा समारोप हा येत्या 4 जून रोजी 'काँग्रेस ढूंढो यात्रे'ने होईल असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. बरेलीमधून भाजपाचे उमेदवार छत्रपाल गंगवार यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी असं म्हटलं आहे. 

"आमच्यासमोर ही घमंडीया आघाडी निवडणूक लढवत आहे. त्यांचे राजपुत्र राहुलबाबा यांनी भारत जोडो यात्रेने निवडणुकीची सुरुवात केली. पण आज मी बरेलीला सांगून जात आहे की त्यांची सुरुवात 'भारत जोडो' यात्रेने झाली होती पण 4 जूननंतर तिचा 'काँग्रेस ढूंढो' यात्रेने समारोप होणार आहे. दोन टप्प्यातील निवडणुकीत काँग्रेस दुर्बिणीतूनही दिसत नाही आणि नरेंद्र मोदी शतक ठोकून 400 च्या शर्यतीत खूप पुढे गेले आहेत" असा दावा अमित शाह यांनी केला आहे.

"ही निवडणूक नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणार आहे. ही निवडणूक आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक म्हणजे तीन कोटी लखपती दीदी निर्माण करण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याची निवडणूक आहे" असंही म्हटलं आहे. 

अयोध्येत राम मंदिर उभारणीचा संदर्भ देत गृहमंत्र्यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवरही टीका केली. त्यांनी आरोप केला की, "70 वर्षांपासून काँग्रेस पक्ष राम मंदिराचा मुद्दा रखडवत होतं, पुढे ढकलत होतं. तुम्ही नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान केलं, त्यानंतर पाच वर्षांतच मोदींनी केस जिंकली, भूमिपूजन केलं आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करून जय श्री रामचा जयघोष केला."

"समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, त्यांची पत्नी डिंपल, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे मंदिर बांधकाम ट्रस्टने पाठवलेल्या निमंत्रणानंतरही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत कारण त्यांना त्यांच्या 'व्होट बँके'ची भीती होती. जर तिथे गेलो तर मतं मिळणार नाहीत. त्याच्याकडे कोणती व्होट बँक आहे हे तुम्हाला माहीत आहे ना?"

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप करत अमित शाह म्हणाले की, "अखिलेशजी यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि सोनियाजी यांना त्यांचा मुलगा राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. जे आपल्या मुलाला, मुलीला, पत्नीला, भावाला, पुतण्याला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बनवण्यासाठी राजकारणात आहे, ते बरेलीच्या तरुणांचं भलं कसं करू शकतात? गरीब कुटुंबातून आलेले नरेंद्र मोदीच त्यांचं भलं करू शकतात."

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादव