शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? अमित शहांचा विरोधकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 17:02 IST

आघाडी देशाचं भलं करु शकत नाही. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे असा सवाल करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला

मुरादाबाद - विरोधी पक्षाकडे ना नेता आहे, ना निती आहे, स्वार्थासाठी एकत्र येऊन या पक्षांनी आघाडी केली. या लोकांना कोणताही विचार नाही. धोरण नाही. नेतृत्वहिन आघाडी आहे. ही आघाडी देशाचं भलं करु शकत नाही. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे असा सवाल करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे अमित शहा हे भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला संबोधित करत होते.

यावेळी अमित शहा म्हणाले की, भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएसोबत आगामी निवडणुकीत उतरली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि विरोधी नेते आघाड्या घेऊन पुढे आहे. आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर आमचे नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील हे आमचे ठरलेलं आहे. मात्र तुमचे नेतृत्व कोण आहे? देशात मौनीबाबा मनमोहन सिंग यांचे सरकार नाही तर नरेंद्र मोदी यांचे सरकार हवंय. 

पाकिस्तानच्या घरात घुसून आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले. दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचं काम भाजपा करत आहे. पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. पूर्ण देश आक्रोशात होता. पाकिस्तानकडून सीमेवर सैन्य तैनात करण्यात आलं पाकिस्तानला मोदी सरकारची भिती वाटत होती त्यांना वाटत होतं की पुन्हा भारत आपल्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल मात्र मोदींनी हवाई स्ट्राइक करत पाकिस्तानला जोरदार धडा शिकवला. आपल्या सीमेशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं हे नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं. एअर स्ट्राइकनंतर देश आनंदात होता तर काँग्रेसचे मंडळी दुख: व्यक्त करत होती असंही अमित शहा म्हणाले. 

शत्रू गोळी चालवत असेल तर गोळीनेच उत्तर दिले जाईल हे भारतीय जनता पार्टीचे धोरण आहे. देशाच्या सैन्यावर गौरव करणे ही आमची पार्टी आहे तर तुम्ही पुरावे मागत आहे. पाकिस्तानचा मिडीया पहा, मग तुम्हाला समजेल मोदींनी पाकिस्तानसोबत काय केलं आहे. देशातील जवानांवर संशय व्यक्त करताय हा देशातील शहीदांचा अपमान आहे असा टोला अमित शहा यांनी काँग्रेसला लगावला. दहशतवाद्यांनी जशास तसं उत्तर देणारा पंतप्रधान हवा, 30 वर्ष तुम्ही दहशतवाद्यांना बिर्याणी खायला देत होता मात्र आता हे दिवस गेले. आता पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर दहशतवाद्यांच्या मनात धडकी भरेल असा नेता हवा. नरेंद्र मोदीशिवाय देशाचे नेतृत्व करेल असा नेता कोणीच नाही असंही अमित शहा यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmit Shahअमित शहाRahul Gandhiराहुल गांधीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीNarendra Modiनरेंद्र मोदी