शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नरेंद्र मोदी ड्रामा किंग, काँग्रेसचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 15:30 IST

नरेंद्र मोदी ड्रामा किंग असून न्याय योजनेची खिल्ली म्हणजे गरिबांची खिल्ली पंतप्रधानांनी उडवल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. 

नवी दिल्ली - मेरठमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांना टीकेचे लक्ष्य केले. काँग्रेसच्या न्याय योजनेचीही मोदी यांच्याकडून खिल्ली उडविण्यात आली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा काँग्रेसकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. नरेंद्र मोदी ड्रामा किंग असून न्याय योजनेची खिल्ली म्हणजे गरिबांची खिल्ली पंतप्रधानांनी उडवल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय योजनेवर टीका करताना म्हणाले होते की, ज्यांना गरिबांचे बॅंकेत खाते खोलता आले नाही ते लोक गरिबांना पैसे काय देणार? ही टीका काँग्रेसच्या जिव्हारी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांची खिल्ली उडवली असून त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणीही केली आहे. तसेच नोटबंदीच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवत गरिबांची खिल्ली उडवली होती असंही सुरजेवाला यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीची तुलना दारुच्या व्यसनाशी केली होती. ही नशा जनतेला बिघडवून टाकेल अशी टीका केली होती यावरही सुरजेवाला यांनी टीका केली. लोकशाहीत राजकीय पक्षांमध्ये कितीही मतभेद असले तरी एका मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींकडून नेहमी या मर्यादेचे उल्लंघन केले जाते. पंतप्रधानपदावर असणाऱ्या व्यक्तीने लोकशाहीमध्ये अशी टीका करणे त्या पदाला शोभा देत नाही. 2017 मध्ये भाजपाने उत्तर प्रदेशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली ती पूर्ण केलीत का? असा सवाल सुरजेवाला यांनी केला. 

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार अभियानाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. यावेळच्या निवडणुकीत एकीकडे चौकीदार आहे आणि दुसरीकडे डागदार नेत्यांची जमवाजमव आहे. पाच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडे आशीर्वाद मागितला होता. तुम्हीही मला भरभरून प्रेम दिले. आता गेल्या पाच वर्षांत मी जे काम केले त्याचा सर्व हिशेब तुम्हाला देईन, तसेच इतरांचा हिशेबही घेईन. दोन्ही कामे एकाच वेळी सुरू राहतील तेव्हाच योग्य हिशोब होईल. शेवटी मी चौकीदार आहे आणि चौकीदार अन्याय करणार नाही असं पंतप्रधान म्हणाले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी