शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

२५० दहशतवादी मारल्याचा आकडा आला कुठून?; अमित शहांनी सांगितला 'सोर्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 12:22 IST

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं, नेमका हा आकडा अमित शहा यांनी कशाच्या आधारावर केला असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता त्यावर अखेर अमित शहा यांनी मौन सोडलं आहे. 

एअर स्ट्राइकनंतर देशभरात जे वातावरण निर्माण झालं होतं, अनेक माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एवढे दहशतवादी मारले अशी चर्चा सुरु होती. माध्यमांमध्येही एअऱ स्ट्राइकनंतर 250 ते 300 दहशतवादी मारल्याचा दावा केला होता. मी सरकारचा प्रतिनिधी नाही, जी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होती त्याच आधारावर मी ते वक्तव्य केलं असल्याचं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडीया या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शहा बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणा झाल्यानंतर अमित शहा यांची ही पहिली मुलाखत आहे. 

पाकिस्तानच्या मिडीयामध्ये आणि संसदेत असा दावा केला की, पाकिस्ताने भारतात 20 लढाऊ विमाने पाठवली त्यांच्या या खोट्या दाव्याने कळून येतं की पाकिस्तानला एअर स्ट्राइकचा किती धसका बसला असेल. पाकिस्तानात दहशतवादी मारले गेले असा पाकिस्तानी मिडीया बोलत आहे तर भारतात विरोधी पक्ष या एअर स्ट्राइकबाबत पुरावे मागत आहे. 

या मुलाखतीत अमित शहा यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी यांच्या सारखे कणखर नेतृत्व आहे. मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेत देशाने आघाडी घेतली आहे. सध्या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं हा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात देशाला सुरक्षित ठेवण्याची क्षमता आहे. निवडणुकीच्या काळात देशाची सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. देशात मोदींच्या नेतृत्वात बहुमतात सरकार आलं तर राष्ट्रीय सुरक्षा मजबूत बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारताने बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून एअर स्ट्राइक केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून दहशतवाद्यांना बालकोट भागात प्रशिक्षण दिलं जातं होतं. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर एअर स्ट्राइक करत मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmit Shahअमित शहाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी