शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

२५० दहशतवादी मारल्याचा आकडा आला कुठून?; अमित शहांनी सांगितला 'सोर्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 12:22 IST

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं, नेमका हा आकडा अमित शहा यांनी कशाच्या आधारावर केला असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता त्यावर अखेर अमित शहा यांनी मौन सोडलं आहे. 

एअर स्ट्राइकनंतर देशभरात जे वातावरण निर्माण झालं होतं, अनेक माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एवढे दहशतवादी मारले अशी चर्चा सुरु होती. माध्यमांमध्येही एअऱ स्ट्राइकनंतर 250 ते 300 दहशतवादी मारल्याचा दावा केला होता. मी सरकारचा प्रतिनिधी नाही, जी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होती त्याच आधारावर मी ते वक्तव्य केलं असल्याचं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडीया या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शहा बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणा झाल्यानंतर अमित शहा यांची ही पहिली मुलाखत आहे. 

पाकिस्तानच्या मिडीयामध्ये आणि संसदेत असा दावा केला की, पाकिस्ताने भारतात 20 लढाऊ विमाने पाठवली त्यांच्या या खोट्या दाव्याने कळून येतं की पाकिस्तानला एअर स्ट्राइकचा किती धसका बसला असेल. पाकिस्तानात दहशतवादी मारले गेले असा पाकिस्तानी मिडीया बोलत आहे तर भारतात विरोधी पक्ष या एअर स्ट्राइकबाबत पुरावे मागत आहे. 

या मुलाखतीत अमित शहा यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी यांच्या सारखे कणखर नेतृत्व आहे. मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेत देशाने आघाडी घेतली आहे. सध्या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं हा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात देशाला सुरक्षित ठेवण्याची क्षमता आहे. निवडणुकीच्या काळात देशाची सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. देशात मोदींच्या नेतृत्वात बहुमतात सरकार आलं तर राष्ट्रीय सुरक्षा मजबूत बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारताने बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून एअर स्ट्राइक केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून दहशतवाद्यांना बालकोट भागात प्रशिक्षण दिलं जातं होतं. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर एअर स्ट्राइक करत मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmit Shahअमित शहाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी