- विकास झाडेदिल्लीत २०१४ मधील निकालाची पुनरावृत्ती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झाली आहे. सातही जागांवर भाजपने भगवा फडकवला. दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि कॉँग्रेसची आघाडी न झाल्याने दोन्ही पक्षाला कपाळावर हात मारून घ्यावा लागला आहे. दोन्ही पक्षांच्या मतांची गोळाबेरीज भाजपच्या विजयी उमेदवरांपेक्षा अधिक आहे.
२०१९ मधील दिल्लीत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे असल्यास कॉँग्रेस आणि ‘आप’ ला आघाडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. दोन्ही पक्षाने एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप कमी करीत मवाळ धोरण स्वीकारले. दिल्लीतील ७ पैकी एकही जागा आपल्याला मिळणार नाही याची खात्री भाजपला होती. ज्या दिवशी आप आणि कॉँग्रेसच्या आघाडीला पूर्णविराम मिळाला असे लक्षात आले तेव्हाच दिल्लीतील सातही जागांवर भाजपचे उमेदवार निवडूण येतील हे स्पष्ट झाले होते. दिल्लीत नऊ महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव दिल्लीत अद्यापही दिसत असला तरी आज झालेल्या मतमोजणीनंतर सात पैकी पाच जागांवर आप तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेली आहे.झारखंड । कमळ पुन्हा फुललेझारखंडमध्ये २०१४ च्याच निकालांची पुनरावृत्ती होऊन भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. त्यांना १२ जागा मिळाल्या आहेत. यात गिरिदीह येथून आॅल झारखंड स्टुडंटस् युनियनच्या चंद्रपकाश चौधरी यांचा समावेश आहे. यावेळेचे वैशिष्ट्य म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन आणि झारखंड विकास मंचचे बाबूलाल मरांडी यांना जनतेने नाकारले. तब्बल आठ वेळा खासदार राहिलेले शिबू सोरेन गेल्यावेळी मोदी लाटेतही निवडून आले होते परंतु यावेळी सुनील सोरेन यांनी वचपा काढला आहे. कोडरमा मतदारसंघात बाबुलाल मरांडी यांचा भाजपच्या अन्नपूर्णा देवी यांनी पार धुव्वा उडवला. माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हे मात्र भाजपकडून खुंटी मतदारसंघात फक्त दोन हजाराच्या फरकाने निवडून आले. गेल्यावेळी काँग़्रेसला एकही जागा मिळाली नव्हती पण त्यांनी यावेळी किमान आपले खाते खोलले आहे.
अंदमान । काँग्रेसला मिळाली आघाडीअंदमान निकोबार बेटावरील एकमेव जागासाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमध्ये येथे काटाजोड लढत होती. भाजपच्या विशाल जॉली यांनी काँग्रेसच्या कुलदीप रॉय शर्मा यांच्याविरोधात आघाडी घेतली होती. विजयाचेपारडे वर-खाली होत आहे. एकमेव जागा असली तरी येथे काँग्रेस, भाजपसह आप, तृणमूल काँग्रेस, बसपा यांचे उमेदवारदेखील रिंगणात होते. २०१४ मध्ये भाजपच्या बिष्णू पाडा रॉय यांनी येथून विजय मिळविला होता.