शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 14:10 IST

'काँग्रेसच्या राजपुत्राला आपल्या राजा-महाराजांचे योगदान आठवत नाही. व्होटबँकेसाठी हे लोक फक्त नवाब, बादशाह, सुलतान यांच्याविषयी बोलतात.'

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. 400 चा आकडा पार करण्याचे मिशन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पक्षाचे सर्वच मोठे नेते सध्या विविध ठिकाणी जोरदार प्रचार करत आहेत. पक्षाने यंदा दक्षिणेकडील राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जोरदार प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत.

'काँग्रेसला व्होट बँकेची चिंता'कर्नाटकातील बेळगावमधये पीएम मोदींनी एका सभेला संबोधित केले. यावेळीही पंतप्रधान नेहमीप्रमाणेच अतिशय आक्रमक दिसले. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील काँग्रेस सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेस सरकार केवळ तुष्टीकरणाला प्राधान्य देते, त्यांच्यासाठी नेहासारख्या मुलींच्या जीवाची काहीही किंमत नाही. काँग्रेसला फक्त आपल्या व्होट बँकेची चिंता आहे. बंगळुरुतील कॅफेमध्ये झालेला बॉम्बस्फोटदेखील काँग्रेसने गांभीर्याने घेतला नाही.

'काँग्रेस पीएफआयला संरक्षण देते''काँग्रेसने मतांसाठी पीएफआय या दहशतवादी संघटेचा वापर केला. पण, आम्ही या संस्थेवर बंदी घातली. वायनाडची जागा जिंकता यावी यासाठी काँग्रेस त्या संघटनेचा बचाव करत आहे. काँग्रेस केवळ एका जागेसाठी पीएफआयला संरक्षण देत आहे. काँग्रेसच्या राजपुत्राला आमच्या राजे आणि सम्राटांचे योगदान आठवत नाही. व्होटबँकेच्या राजकारणासाठी हे लोक राजे-सम्राटांच्या विरोधात बोलतात पण नवाब, बादशाह, सुलतान यांच्या विरोधात एक शब्दही काढण्याचे धाडस त्यांच्यात नाही. राजपुत्र म्हणतो की, भारताचे राजा महाराज गरिबांची जमीन बळकवायचे. पम, आमची शेकडो मंदिरे पाडणाऱ्या औरंगजेबाचे अत्याचार काँग्रेसला आठवत नाहीत.'

‘काँग्रेस फक्त घराण्याच्या हितात अडकली’'काँग्रेसने लोकशाही नष्ट करण्याचे काम केले आहे. ईव्हीएमच्या बहाण्याने काँग्रेस देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचत आहे. काँग्रेसचे लोक मानसिकदृष्ट्या इंग्रजीच्या गुलामगिरीत जगत आहेत. काँग्रेस देशहितापासून दूर गेली असून, फक्त घराण्याच्या हिताच्या विळख्यात अडकली आहे', अशी जोरदार टीका पंतप्रधान मोदींनी यावेळे केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसkarnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल