शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 14:10 IST

'काँग्रेसच्या राजपुत्राला आपल्या राजा-महाराजांचे योगदान आठवत नाही. व्होटबँकेसाठी हे लोक फक्त नवाब, बादशाह, सुलतान यांच्याविषयी बोलतात.'

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. 400 चा आकडा पार करण्याचे मिशन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पक्षाचे सर्वच मोठे नेते सध्या विविध ठिकाणी जोरदार प्रचार करत आहेत. पक्षाने यंदा दक्षिणेकडील राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जोरदार प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत.

'काँग्रेसला व्होट बँकेची चिंता'कर्नाटकातील बेळगावमधये पीएम मोदींनी एका सभेला संबोधित केले. यावेळीही पंतप्रधान नेहमीप्रमाणेच अतिशय आक्रमक दिसले. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील काँग्रेस सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेस सरकार केवळ तुष्टीकरणाला प्राधान्य देते, त्यांच्यासाठी नेहासारख्या मुलींच्या जीवाची काहीही किंमत नाही. काँग्रेसला फक्त आपल्या व्होट बँकेची चिंता आहे. बंगळुरुतील कॅफेमध्ये झालेला बॉम्बस्फोटदेखील काँग्रेसने गांभीर्याने घेतला नाही.

'काँग्रेस पीएफआयला संरक्षण देते''काँग्रेसने मतांसाठी पीएफआय या दहशतवादी संघटेचा वापर केला. पण, आम्ही या संस्थेवर बंदी घातली. वायनाडची जागा जिंकता यावी यासाठी काँग्रेस त्या संघटनेचा बचाव करत आहे. काँग्रेस केवळ एका जागेसाठी पीएफआयला संरक्षण देत आहे. काँग्रेसच्या राजपुत्राला आमच्या राजे आणि सम्राटांचे योगदान आठवत नाही. व्होटबँकेच्या राजकारणासाठी हे लोक राजे-सम्राटांच्या विरोधात बोलतात पण नवाब, बादशाह, सुलतान यांच्या विरोधात एक शब्दही काढण्याचे धाडस त्यांच्यात नाही. राजपुत्र म्हणतो की, भारताचे राजा महाराज गरिबांची जमीन बळकवायचे. पम, आमची शेकडो मंदिरे पाडणाऱ्या औरंगजेबाचे अत्याचार काँग्रेसला आठवत नाहीत.'

‘काँग्रेस फक्त घराण्याच्या हितात अडकली’'काँग्रेसने लोकशाही नष्ट करण्याचे काम केले आहे. ईव्हीएमच्या बहाण्याने काँग्रेस देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचत आहे. काँग्रेसचे लोक मानसिकदृष्ट्या इंग्रजीच्या गुलामगिरीत जगत आहेत. काँग्रेस देशहितापासून दूर गेली असून, फक्त घराण्याच्या हिताच्या विळख्यात अडकली आहे', अशी जोरदार टीका पंतप्रधान मोदींनी यावेळे केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसkarnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल