शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही घेऊ शकत नाही', अमित शाह यांचे मोठे वक्तव्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:52 IST

विरोधकांकडून सातत्याने चीनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला जातो.

Lok Sabha Election : गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरू आहे. या सीमावादामुळे अनेकदा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशातच, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून चीन मोठ्या प्रमाणावर भारतीय भूमीवर कब्जा करतोय, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. पण, प्रत्येकवेळी सरकारकडून या आरोपाचे खंडन केले जाते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याचा पुन्नरुच्चार केला. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी(दि.9) आसाममधील लखीमपूर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून, चीन भारताची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ शकला नाही. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये चिनी हल्ल्यावेळी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला 'बाय-बाय' केले होते, हे जनता कधीही विसरू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तुमचा खासदार कोण असेल, कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला हवंय आणि पुढचा पंतप्रधान कोणाला करायचे, हे तुम्हाला 19 एप्रिलला ठरवावे लागेल. तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत, एका बाजूला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI आघाडी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आहे. 

यावेळी शाह यांनी राम मंदिराचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बांगलादेशची सीमा सुरक्षित करुन घुसखोरी थांबवली. आगामी काळात आसाम देशातील इतर राज्यांप्रमाणे विकसित राज्य बनेल. काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवला, पण हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chinaचीनIndiaभारत