शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही घेऊ शकत नाही', अमित शाह यांचे मोठे वक्तव्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:52 IST

विरोधकांकडून सातत्याने चीनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला जातो.

Lok Sabha Election : गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरू आहे. या सीमावादामुळे अनेकदा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशातच, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून चीन मोठ्या प्रमाणावर भारतीय भूमीवर कब्जा करतोय, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. पण, प्रत्येकवेळी सरकारकडून या आरोपाचे खंडन केले जाते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याचा पुन्नरुच्चार केला. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी(दि.9) आसाममधील लखीमपूर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून, चीन भारताची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ शकला नाही. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये चिनी हल्ल्यावेळी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला 'बाय-बाय' केले होते, हे जनता कधीही विसरू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तुमचा खासदार कोण असेल, कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला हवंय आणि पुढचा पंतप्रधान कोणाला करायचे, हे तुम्हाला 19 एप्रिलला ठरवावे लागेल. तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत, एका बाजूला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI आघाडी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आहे. 

यावेळी शाह यांनी राम मंदिराचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बांगलादेशची सीमा सुरक्षित करुन घुसखोरी थांबवली. आगामी काळात आसाम देशातील इतर राज्यांप्रमाणे विकसित राज्य बनेल. काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवला, पण हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chinaचीनIndiaभारत