शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

“काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही, उमेदवार जिंकून आला तरी नंतर भाजपामध्येच येईल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 10:00 IST

Lok Sabha Election 2024: काँग्रेसमधून विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना भाजपमध्ये आणणार आहे, असा निर्धार हेमंत बिस्वा सरमा यांनी बोलून दाखवला.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्वच पक्षांनी जागावाटप आणि उमेदवारी निश्चित करण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचा पराभव करण्याचा चंग इंडिया आघाडीने बांधला आहे. मात्र, काँग्रेसमधील गळती थांबताना दिसत नाही. यावरून एका मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना, काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही. कारण उमेदवार जिंकून आला तरी कालांताने तो भाजपामध्येच येईल, असा खोचक टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसला मतदान करून फायदा नाही, कारण कोणी जिंकले तरी कालांतराने भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये राहतील की नाही, याबाबत शंका आहे. कारण प्रत्येकाला भाजपमध्ये यायचे आहे, असा दावा हेमंत बिस्वा सरमा यांनी केला. ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराला पक्षात राहायचे नाही

काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराला पक्षात राहायचे नाही, सर्वांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे. एक वगळता काँग्रेसमधून विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना भाजपमध्ये आणणार आहे, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करणार आहेत, असा दावा करताना, आम्ही अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काम करत आहोत. अल्पसंख्यक तरुणांना लाच न देता काम मिळत आहे. भाजपा करीमगंज आणि नागाव जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या महिन्यात आसाममधील काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील हिमंता बिस्वा सरमा सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. आसामचे मंत्री आणि हिमंता यांचे सहकारी पीयूष हजारिका यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या चार सांगितली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस