शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

“काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही, उमेदवार जिंकून आला तरी नंतर भाजपामध्येच येईल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 10:00 IST

Lok Sabha Election 2024: काँग्रेसमधून विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना भाजपमध्ये आणणार आहे, असा निर्धार हेमंत बिस्वा सरमा यांनी बोलून दाखवला.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्वच पक्षांनी जागावाटप आणि उमेदवारी निश्चित करण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचा पराभव करण्याचा चंग इंडिया आघाडीने बांधला आहे. मात्र, काँग्रेसमधील गळती थांबताना दिसत नाही. यावरून एका मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना, काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही. कारण उमेदवार जिंकून आला तरी कालांताने तो भाजपामध्येच येईल, असा खोचक टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसला मतदान करून फायदा नाही, कारण कोणी जिंकले तरी कालांतराने भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये राहतील की नाही, याबाबत शंका आहे. कारण प्रत्येकाला भाजपमध्ये यायचे आहे, असा दावा हेमंत बिस्वा सरमा यांनी केला. ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराला पक्षात राहायचे नाही

काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराला पक्षात राहायचे नाही, सर्वांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे. एक वगळता काँग्रेसमधून विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना भाजपमध्ये आणणार आहे, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करणार आहेत, असा दावा करताना, आम्ही अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काम करत आहोत. अल्पसंख्यक तरुणांना लाच न देता काम मिळत आहे. भाजपा करीमगंज आणि नागाव जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या महिन्यात आसाममधील काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील हिमंता बिस्वा सरमा सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. आसामचे मंत्री आणि हिमंता यांचे सहकारी पीयूष हजारिका यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या चार सांगितली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस