शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

“काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही, उमेदवार जिंकून आला तरी नंतर भाजपामध्येच येईल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 10:00 IST

Lok Sabha Election 2024: काँग्रेसमधून विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना भाजपमध्ये आणणार आहे, असा निर्धार हेमंत बिस्वा सरमा यांनी बोलून दाखवला.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्वच पक्षांनी जागावाटप आणि उमेदवारी निश्चित करण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचा पराभव करण्याचा चंग इंडिया आघाडीने बांधला आहे. मात्र, काँग्रेसमधील गळती थांबताना दिसत नाही. यावरून एका मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना, काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही. कारण उमेदवार जिंकून आला तरी कालांताने तो भाजपामध्येच येईल, असा खोचक टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसला मतदान करून फायदा नाही, कारण कोणी जिंकले तरी कालांतराने भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये राहतील की नाही, याबाबत शंका आहे. कारण प्रत्येकाला भाजपमध्ये यायचे आहे, असा दावा हेमंत बिस्वा सरमा यांनी केला. ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराला पक्षात राहायचे नाही

काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराला पक्षात राहायचे नाही, सर्वांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे. एक वगळता काँग्रेसमधून विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना भाजपमध्ये आणणार आहे, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करणार आहेत, असा दावा करताना, आम्ही अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काम करत आहोत. अल्पसंख्यक तरुणांना लाच न देता काम मिळत आहे. भाजपा करीमगंज आणि नागाव जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या महिन्यात आसाममधील काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील हिमंता बिस्वा सरमा सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. आसामचे मंत्री आणि हिमंता यांचे सहकारी पीयूष हजारिका यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या चार सांगितली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस