शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 11:41 IST

Lok Sabha Election 2024 Smriti Irani And Rahul Gandhi : स्मृती इराणींना अमेठीतून पुन्हा विजयाची आशा आहे. एका रॅलीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठीत राहुल गांधींनास्मृती इराणींकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी काँग्रेसने येथून गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय केएल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. स्मृती इराणींना अमेठीतून पुन्हा विजयाची आशा आहे. एका रॅलीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. स्मृती इराणी म्हणाल्या की, "आतापर्यंत मी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवत असे, पण आता एका पाकिस्तानी नेत्याने स्मृती इराणींचा पराभव करायला हवा, असं म्हटलं आहे."

"मी विचार केला, तुम्ही पाकिस्तानला सांभाळू शकत नाही आणि तुम्ही अमेठीची चिंता करत आहात? जर माझा आवाज पाकिस्तानी नेत्यापर्यंत पोहोचत असेल, तर मला सांगायचे आहे की, ही अमेठी आहे, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एके 203 रायफलची फॅक्टरी बनवली आहे. त्या रायफलचा वापर सीमेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांना मारण्यासाठी गेला जात आहे. आज मला विचारायचं आहे की, पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे? देशात निवडणुका सुरू आहेत" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. 

गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये राहुल गांधींचं कौतुक केलं होतं. तेव्हापासून राहुल गांधी या मुद्द्यावरून भाजपाच्या निशाण्यावर आहेत. मोदींसह बहुतेक नेत्यांनी त्यांच्या ‘पाकिस्तान कनेक्शन’वर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि पाकिस्तान यांच्यात "भागीदारी" असल्याचा आरोप केला होता आणि ते आता "पूर्णपणे उघड" झाल्याचं म्हटलं होतं. 

"तुम्हाला कळलं असेल की एक पाकिस्तानी नेता काँग्रेससाठी प्रार्थना करत आहे. पाकिस्तान राजपुत्राला (राहुल गांधी) पंतप्रधान करण्यासाठी अधीर आहे... आणि आम्हाला माहीत आहे की काँग्रेस पाकिस्तानची अनुयायी आहे" असं मोदींनी म्हटलं होतं. वायनाडमधून निवडणूक लढवत असलेल्या राहुल गांधींना गेल्या आठवड्यात रायबरेलीमधून उमेदवार घोषित करण्यात आले. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. 

राहुल गांधी पुन्हा अमेठी जिंकण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा होती, जिथून ते तीन वेळा विजयी झाले आहेत. अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयाला काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी धोरणात्मक पाऊल म्हटलं आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला. राहुल गांधींनी पळून जाऊ नये, घाबरू नये, असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा