शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

जागा कमी, मित्रपक्ष जास्त... महाराष्ट्रापासून या राज्यांपर्यंत BJPसाठी जागावाटप ठरतंय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 16:45 IST

Lok Sabha Election 2024: काही जुने मित्रपक्ष एनडीएमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. ४०० पारचं लक्ष्य गाठण्यासाठी भाजपा आपले मित्रपक्ष वाढवत आहे. मात्र त्यामुळे जागावाटपाबाबतचं आव्हान भाजपासमोर उभं राहिलं आहे.  

अब की बार ४०० पार म्हणत भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. तसेच ४०० जागांच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी भाजपाने मागच्या काही महिन्यांत अनेक अनेक मित्रपक्ष जोडले आहेत. उत्तर प्रदेशात आरएलडी, बिहारमध्ये जेडीयू हे मित्रपक्ष एनडीएमध्ये परतले आहेत. तर ओदिशामध्ये बीजेडी, आंध्र प्रदेशमध्ये टीआरएस हे जुने मित्रपक्ष एनडीएमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. ४०० पारचं लक्ष्य गाठण्यासाठी भाजपा आपले मित्रपक्ष वाढवत आहे. मात्र त्यामुळे जागावाटपाबाबतचं आव्हान भाजपासमोर उभं राहिलं आहे.  

जागा कमी आणि मित्रपक्ष अधिक झाल्याने महाराष्ट्रापासूनबिहार, ओदिशा आणि आंध्र् प्रदेश या राज्यांमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाने आरएलडी, सुभासपा, निषाद पार्टी, अपना दल सोनेलाल या पक्षांसोबत आघाडी केली आहे. मात्र ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने या चार पक्षांची केवळ ६ जागांवर बोळवण केली आहे. आता भाजपाला हाच फॉर्म्युला इतर राज्यांमध्ये अवलंबायचा आहे. मात्र प्रत्येक राज्यात परिस्थिती वेगळी असल्याने भाजपासमोर पेच निर्माण झाला आहे. ही बाब बिहार आणि महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने दिसत आहे.

महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट समाधानकारक जागा मागत आहेत. मात्र लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजपाला अधिकाधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळेच ३० हून अधिक जागांवर भाजपाकडून दावा केला जात आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात भाजपा ३२ लढेल. तर शिवसेना शिंदे गट १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ३ जागा दिल्या जातील आणि उर्वरित ३ जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गटातील उमेदवारांना लढवलं जाण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडे सध्या १३ जागा आहेत. त्यामुळे शिंदे गटाला दहाच जागा दिल्या गेल्या तर उर्वरित खासदारांचं काय होणार, हाही प्रश्न उपस्थित होणार आहे. तर अजित पवार गटाला केवळ ३ जागांवर कसं जुळवून घ्यायला लावायचं हेही भाजपासमोरील आव्हान असेल. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटप हे भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

दुसरीकडे लोकसभेच्या ४० जागा असलेल्या बिहारमध्येही जागावाटप ही भाजपासाठी डोकेदुखी ठरलेली आहे. बिहारमध्ये एनडीएत भाजपासह सहा पक्ष आहेत. त्यात सर्वाधिक जागा भाजपाला लढवायच्या आहेत. मात्र असं करत असताना जेडीयू, हम, एलजेपीआर, आरएलजेपी, आरएलएम या छोट्या मोठ्या पक्षांना कसं सामावून घ्यायचं, याचंही आव्हान भाजपासमोर असणार आहे.

याशिवाय आंध्र प्रदेशमध्ये भाजपा आणि टीडीपी यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युलासुद्धा समोर आला आहे. राज्यात लोकसभेच्या जागा असून, त्यापैकी १७ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. भाजपाला ५ जागा दिल्या जाऊ शकतात. तर पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला ३ जागा देण्यात आल्या आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही.

दुसरीकडे ओदिशामध्येही भाजपा आणि बीजेडी यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. ओदिशामध्ये भाजपाला लोकसभेच्या अधिकाधिक जागा लढायच्या आहेत. भाजपाकडून १४ जागांवर दावा केला जात आहे. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथे बीजेडीने १२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे बीजेडी भाजपाला एवढ्या जागा सोडणार आहे का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रBiharबिहार