शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 17:28 IST

Lok Sabha Election 2024: पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवर विरोधी पक्षांसह काही नेते सातत्यानेश शंका घेत असतात. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत या हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवर विरोधी पक्षांसह काही नेते सातत्यानेश शंका घेत असतात. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

रेवंत रेड्डी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना म्हणाले की, केंद्र सरकारने पुलवामा हल्ल्याबाबत आतापर्यंत काही खुलासा केलेला नाही. या हल्ल्यामध्ये कुणाचा हात होता. हल्ल्यात वापरलेली स्फोटकं कुठून आली होती. याचा तपास का झाला नाही, असा प्रश्न रेवंत रेड्डी यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, सरकारच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या. हा हल्ला का रोखता आला नाही. सरकारने आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी करून हल्ला रोखण्यात अपयशी ठरलेल्या लोकांना समोर का आणले नाही. या हल्ल्याला कोण जबाबदार होते, हा प्रश्न आजही कायम आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, खरोखरच एअरस्ट्राईक झाली होती की नाही, देवास ठाऊक. दरम्यान, रेवंत रेड्डी यांच्या या विधानानंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री एअर स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्याबाबत पाकिस्तानला क्लीन चिट देण्याचा का प्रयत्न करत आहेत, असा सवाल भाजपा नेते बंडी संजय कुमार यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, ज्यांचं पाकिस्तानमधील वृत्तपत्रांमधून कौतुक होतं. तेच आज राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत आहेत. ही तीच काँग्रेस आहे जी  गोकुळ गेट, मक्का मशीद, दिलखुशनगर, लुंबिनी पार्क येथील बॉम्बस्फोटांना जबाबदार आहे. काँग्रेस राष्ट्रीय सुरक्षेवर बोलणारी शेवटची पार्टी असली पाहिजे. काही दिवसांनी काँग्रेसवाले हे बॉम्बस्फोट झालेच नाही, असं म्हणतील. राजकीय लाभासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री भारतीय सैन्याच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील, असं वाटलं नव्हतं, असा टोला बंडी संजय कुमार यांनी लगावला.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४telangana lok sabha election 2024तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल २०२४Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपा