शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 17:28 IST

Lok Sabha Election 2024: पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवर विरोधी पक्षांसह काही नेते सातत्यानेश शंका घेत असतात. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत या हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवर विरोधी पक्षांसह काही नेते सातत्यानेश शंका घेत असतात. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

रेवंत रेड्डी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना म्हणाले की, केंद्र सरकारने पुलवामा हल्ल्याबाबत आतापर्यंत काही खुलासा केलेला नाही. या हल्ल्यामध्ये कुणाचा हात होता. हल्ल्यात वापरलेली स्फोटकं कुठून आली होती. याचा तपास का झाला नाही, असा प्रश्न रेवंत रेड्डी यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, सरकारच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या. हा हल्ला का रोखता आला नाही. सरकारने आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी करून हल्ला रोखण्यात अपयशी ठरलेल्या लोकांना समोर का आणले नाही. या हल्ल्याला कोण जबाबदार होते, हा प्रश्न आजही कायम आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, खरोखरच एअरस्ट्राईक झाली होती की नाही, देवास ठाऊक. दरम्यान, रेवंत रेड्डी यांच्या या विधानानंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री एअर स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्याबाबत पाकिस्तानला क्लीन चिट देण्याचा का प्रयत्न करत आहेत, असा सवाल भाजपा नेते बंडी संजय कुमार यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, ज्यांचं पाकिस्तानमधील वृत्तपत्रांमधून कौतुक होतं. तेच आज राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत आहेत. ही तीच काँग्रेस आहे जी  गोकुळ गेट, मक्का मशीद, दिलखुशनगर, लुंबिनी पार्क येथील बॉम्बस्फोटांना जबाबदार आहे. काँग्रेस राष्ट्रीय सुरक्षेवर बोलणारी शेवटची पार्टी असली पाहिजे. काही दिवसांनी काँग्रेसवाले हे बॉम्बस्फोट झालेच नाही, असं म्हणतील. राजकीय लाभासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री भारतीय सैन्याच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील, असं वाटलं नव्हतं, असा टोला बंडी संजय कुमार यांनी लगावला.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४telangana lok sabha election 2024तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल २०२४Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपा