शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

राहुल आणि प्रियंका गांधी या मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक, UP-बिहारमधील ४० जागांवर काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:56 IST

Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेश आणि बिहारमधील किमान ३० ते ४० जागांवर काँग्रेसकडून दावेदारी ठोकण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मतदारसंघही काँग्रेसकडून निश्चित करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये होणाऱ्या जागावाटपाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील किमान ३० ते ४० जागांवर काँग्रेसकडून दावेदारी ठोकण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मतदारसंघही काँग्रेसकडून निश्चित करण्यात आले आहेत. राहुल गांधी रायबरेली येथून तर प्रियंका गांधी अमेठी येथून स्मृती इराणी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. येत्या एक दोन दिवसांमध्याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, बिहारमधील सुमारे १५ ते २० जागांवर काँग्रेसकडून महाआघाडीमध्ये दावेदारी करण्यात आली आहे. या जागांवर तारिक अन्वर, अखिलेश प्रसाद सिंह, कन्हैया कुमार, शकील अहमद खान आणि राज्यसभा खासदार रंजीत रंजन या नेत्यांना लढवलं जाण्याची शक्यता आहे. 

इंडिया आघाडीतील बदलत्या समिकरणांदरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस नेत्यांनी जागावाटपाबाबत नव्याने चर्चा सुरू केली आहे.  उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनुक्रमे आरएलडी आणि जेडीयूने साथ सोडल्यानंतर कांग्रेसला अधिका जागा मिळाल्या पाहिजेत, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. दरम्यान, काँग्रेसने समाजवादी पक्षाकडे आपल्या २० उमेदवारांच्या नावांची यादी सोपवली आहे, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील अमेठी, राय बरेली, कानपूर, बलिया, बाराबंकी, मेरठ, महाराजगंज, रामपूर, सहारनपूर, झाशी, फतेहपूर सिक्री, जालौन, बासगांव आणि बिजनौरसारख्या जागांवर दावा केला आहे. जागावाटपाबाबत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. सध्या केवळ ५ ते ६ जागांवरच  सहमती बनली आहे. मात्र काँग्रेस आणि सपामध्ये १५ ते २० जागांवर एकमत होईल, असं बोललं जात आहे.

त्याचप्रमाणे भाजपाने बिहारमध्येही १५ ते २० जागांवर दावेदारी केली आहे. काँग्रेसकडून सुपौल, सासाराम, समस्तीपूर, मधुबनी, दरभंगा, बेगुसराय, पूर्ण चंपारण्य, पटना साहिब, झंझारपूर, किशनगंज, औरंगाबाद, गोपालगंज, कटिहार आमि अररिया या जागांसाठी काँग्रेस आणि आरजेडीमध्ये चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी