शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

PM मोदींच्या फोनमुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबले; माजी नौसैनिक सुखरुप परतले- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 16:02 IST

'जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे मत गांभीर्याने घेतले जाते. जग भारताकडे विश्वासाने पाहत आहे.'

Rajnath Singh Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते विविध भागात प्रचार सभा घेत आहेत. तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच बडे नेते पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. अशातच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करण्यासोबतच मोदी सरकारच्या कामाचाही पाढा वाचला.

'रामनवमी येत आहे, या पापी लोकांना विसरू नका', PM मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

राज्यातील मागील सरकारवर टीका करताना राजनाथ सिंह म्हणाले की, काँग्रेस सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नव्हती. घरात घुसून लोकांचे गळे कापण्यात आले, लोकांना मारण्यात आले. परंतु आता भजनलाल सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ज्या प्रकारे कृतीशील पावले उचलली, ते कौतुकास्पद आहे. कोणत्याही क्षेत्राच्या विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था अतिशय महत्वाचे असते.

मोदींच्या आवाहनामुळे रशियाने युक्रेन युद्ध थांबवलेरशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले की, जेव्हा हे युद्ध सुरू झाले, त्यावेळी भारतातील अनेक मुले युक्रेनमध्ये शिकत होती. मुलांच्या पालकांनी त्यांना युक्रेनमधून परत आणण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींना केले. यानंतर पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना फोन केला. त्यानंतर साडेचार तासांसाठी युद्ध थांबले आणि भारतीय नागरिक सुखरुप परत आले. 

मोदींमुळे माजी नौसैनिकांची शिक्षा माफ झालीराजनाथ सिंह यांनी यावेळी कतरमध्ये माजी सैनिकांना दिलेल्या शिक्षेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, पाच अरब देशांनी पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च सन्मान केलाय. एवढचं काय तर, कतरला गेलेल्या भारतीय नौदलाच्या माजी कर्मचाऱ्यांना तेथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पण, पीएम मोदींनी कतरच्या प्रमुखांना फोन केला आणि त्यानंतर नऊ माजी सैनिकांची सुटका करण्यात आली. 

जगात भारताची प्रतिष्ठा वाढलीयाशिवाय संरक्षणमंत्र्यांनी केंद्रातील मोदी सरकारचेही कौतुक केले. ते म्हणाले की, जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली, हे कोणीही नाकारू शकत नाही. यापूर्वी कोणीही भारताचे म्हणणे गांभीर्याने घेत नसायचे, पण आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या मताला गांभीर्याने घेतात. जग भारताकडे आशा आणि विश्वासाने पाहत आहे. या सर्व गोष्टींचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जाते.

एक देश एक निवडणूक...एक देश एक निवडणुकीवर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाटी पुढाकार घेतला आहे. देशात पुन्हा पुन्हा निवडणुका होऊ नयेत, यासाठी पंतप्रधानांनी एक समिती स्थापन केली होती, ज्याचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करण्यात आला आहे. देशातील जनताही याला साथ देईल, त्यामुळे पैशाबरोबरच वेळेचीही बचत होईल. मात्र काँग्रेसचा त्याला विरोध आहे, प्रत्येक गोष्टीला विरोध करणे, हा काँग्रेसचा स्वभाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४