शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

भाजपसाठी गुडन्यूज, तर इंडिया आघाडीचे टेंशन वाढणार; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 16:58 IST

Lok Sabha Election 2024: निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबात मोठा दावा केला आहे.

Prashant Kishor on INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप '400 पार'चा नारा देत आहेत, तर काँग्रेस भाजपची सत्ता उलथून लावण्याचा दावा करत आहे. या निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे येत्या 4 जुनला कळेलच. पण, तत्पुर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.या दाव्यामुळे भाजपवाले नक्कीच खुश होतील. भाजपला दक्षिण आणि पूर्व भारतात मोठा फायदा मिळेल, या भागांत भाजपची व्होट बँक वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे.

बंगालमध्येही भाजप नंबर 1 चा पक्ष बनेलपीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, प्रशांत किशोर म्हणाले, विरोधकांना भाजपचा विजयरथ रोखण्याच्या अनेक संधी होत्या, परंतु चुकीच्या निर्णयामुळे त्यांनी सर्व संधी गमावल्या. भाजप तेलंगणातील पहिला किंवा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, ही मोठी गोष्ट आहे. भाजप ओडिशातही जास्तीत जास्त जागा जिंकेल. पश्चिम बंगालमध्ये तर भाजप क्रमांक एकचा पक्ष होण्याची दाट शक्यता आहे. तामिळनाडूमध्येही भाजपची मतांची टक्केवारी दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.   

प्रशांत किशोर पुढे म्हणाले, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 204 जागा आहेत, परंतु या भागांमध्ये भाजपला 50 जागाही जिंकता आल्या नाहीत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या भागात 29 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 47 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजप 370 जागा जिंकू शकत नाही, त्यांनी फक्त निवडणुकीसाठी एक लक्ष्य ठेवले आहे.

राहुल गांधींवर टीका भाजपने गेल्या काही वर्षांत दक्षिण आणि पूर्व भारतात मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मोदी आणि अमित शहा यांसारखे भाजप नेते वारंवार या राज्यांना भेट देत आहेत. दुसरीकडे, या राज्यांमध्ये विरोधकांनी फारच कमी प्रयत्न केले. गेल्या पाच वर्षात तमिळनाडूतील निवडणुकांसाठी पंतप्रधानांनी राज्यांना दिलेल्या भेटींची संख्या मोजली तर पंतप्रधानांच्या दौऱ्यासमोर राहुल गांधी किंवा इतर कोणत्याही विरोधी नेत्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त आहेत. राहुल गांधींवर टीका करताना किशोर म्हणाले की, तुमची लढाई उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात आहे, पण तुम्ही मणिपूर आणि मेघालयला भेट देत असाल तर तुम्हाला यश कसे मिळेल.

जगन मोहन रेड्डींचे पुनरागमन अवघडलोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. याबाबत प्रशांत किशोर म्हणाले, जगन मोहन रेड्डी यांना पुनरागमन करणे कठीण जाईल. त्यांनी तरुणांना रोजगार देण्यासाठी किंवा राज्याच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी काहीही केले नाही. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांनीच जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी 2014 मध्ये काम केले होते. यानंतर 2019 मध्ये YSRCPने तेलुगु देसम पक्षाचा (टीडीपी) पराभव केला. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस