शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनव्रतावर काँग्रेसने घेतला आक्षेप, केली अशी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 20:42 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीमधील रॉक मेमोरियल येथे जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. ३० मे ते १ जून या काळात मोदी तिथे ध्यानस्थ राहणार आहेत. मात्र मोदींची ही ध्यानधारणा आणि मौन व्रताविरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीमधील रॉक मेमोरियल येथे जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. ३० मे ते १ जून या काळात मोदी तिथे ध्यानस्थ राहणार आहेत. मात्र मोदींची ही ध्यानधारणा आणि मौन व्रताविरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धाव घेत आपला आक्षेप नोंदवला. 

अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला ४८ तासांच्या  काळात कुणालाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रचार करण्याची परवानगी दिली जाता कामा नये.  कुठलाही नेता काहीही करो, आमचा त्यावर आक्षेप नाही.  त्यांना हवं असेल तर मौनव्रत ठेवावं किंवा आणखी काही करावं. मात्र मतदानापूर्वीच्या ४८ तासांमध्ये अप्रत्यक्ष प्रचार होता कामा नये. नरेंद्र मोदी यांनी ३० मे रोजी संध्याकाळी मौन व्रतासाठी बसण्याची घोषणा केली आहे. हा मौनकाळ ३० मे पासून ते १ जून पर्यंत असेल. हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे.  हा प्रचार सुरू ठेवण्याचा किंवा स्वत:ला चर्चेत ठेवण्याचा हातखंडा आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे की नरेंद्र मोदी यांना १ जून रोजी संध्याकाळी मौनव्रत ठेवण्याची परवानगी द्यावी. मात्र त्यांना याच काळाता मौनव्रत ठेवायचे असल्यास त्यांचं माध्यमांमध्ये प्रसारण होण्यास बंदी घातली पाहिजे.  

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या मौनव्रतावर काँग्रेसबरोबरच टीएमसीनेही टीका केली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ध्यान धारण करताना कॅमेरा नेणं आवश्यक आहे का. मोदी ध्यान धारण करू शकतात. मात्र त्याचं टीव्हीवर प्रसारण होता कामा नये. तसं झाल्यास आम्ही त्याविरोधात तक्रार करू, असा इशारा त्यांनी दिला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४