शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही सोडलं नव्हतं; आणीबाणीच्या आठवणीत राजनाथ सिंह भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 14:03 IST

Loksabha Election 2024: देशातील लोकशाही धोक्यात आहे असा आरोप करणाऱ्या विरोधकांना राजनाथ सिंह यांनी आणीबाणीतील आठवण सांगितलं, जेलमध्ये असताना आईचं निधन झालं, तिच्या अंत्यविधीलाही पेरोल दिला नव्हता असं त्यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - Rajnath Singh on Emergency ( Marathi News ) माझ्या आईला ब्रेन हॅमरेज झालं होतं, तेव्हा काँग्रेस सरकारनं मला पेरोलही दिली नव्हती. मला माझ्या आईच्या अंत्ययात्रेलाही जाता आलं नव्हतं. २७ दिवस माझी आई हॉस्पिटलमध्ये होती आणि मी जेलमध्ये होतो. अखेरच्या काळात आईला पाहूही शकलो नाही असं सांगताना राजनाथ सिंह भावूक झाले. एका मुलाखतीत आणीबाणीचा काळ आठवताना राजनाथ सिंह यांनी हे उत्तर दिलं. 

राजनाथ सिंह म्हणाले की,  ज्या लोकांनी आणीबाणी लावून हुकुमशाही केली ते आज आमच्यावर हुकुमशाहीचा आरोप लावतायेत. आणीबाणीविरोधात आम्ही लोकांमध्ये आवाज उचलत होतो, त्यामुळे आम्हाला जेलमध्ये टाकलं गेले. २७ दिवस आई वाराणसीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. तरीही मला तिला भेटू दिलं नव्हतं. आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही मला जावू दिले नाही असं त्यांनी म्हटलं.

...तर भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार

आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील प्रचारावेळी चीन आणि पाकिस्तान यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यात दहशतवादाच्या मुद्द्यावरून राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला मदतीची ऑफर दिली आहे. ANI न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ यांनी जर पाकिस्तान दहशतवाद्यांशी लढण्यात असक्षम असेल तर भारत दहशतवाद रोखण्यासाठी त्यांची मदत करायला तयार आहे असं मोठं विधान त्यांनी केले आहे.राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान जर दहशतवादाचा आधार घेत भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. पाकिस्ताननं दहशतवादावर नियंत्रण मिळवावं. पाकिस्तान जर दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असेल तर शेजारील देश भारताची मदत घेऊ शकते. दहशतवाद थांबवण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे असं त्यांनी म्हटलं.  

चीनवर थेट निशाणा

जर भारतानं चीनच्या प्रदेशांची नावे बदलली त्याचा अर्थ तो भाग भारताचा बनला असं होत नाही. अरुणाचलमध्ये नामसाई परिसरात एका निवडणूक रॅलीत राजनाथ सिंह यांनी चीनला फटकारत जमिनीवरील वस्तूस्थिती बदलणार नसल्याचं स्पष्ट केले. जोपर्यंत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आहे तोपर्यंत देशातील जमिनीचा एक इंचही कब्जा करू शकणार नाही. पीओके आमचे होते आणि ते कायम राहील असं राजनाथ यांनी ठणकावलं. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस