शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही सोडलं नव्हतं; आणीबाणीच्या आठवणीत राजनाथ सिंह भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 14:03 IST

Loksabha Election 2024: देशातील लोकशाही धोक्यात आहे असा आरोप करणाऱ्या विरोधकांना राजनाथ सिंह यांनी आणीबाणीतील आठवण सांगितलं, जेलमध्ये असताना आईचं निधन झालं, तिच्या अंत्यविधीलाही पेरोल दिला नव्हता असं त्यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - Rajnath Singh on Emergency ( Marathi News ) माझ्या आईला ब्रेन हॅमरेज झालं होतं, तेव्हा काँग्रेस सरकारनं मला पेरोलही दिली नव्हती. मला माझ्या आईच्या अंत्ययात्रेलाही जाता आलं नव्हतं. २७ दिवस माझी आई हॉस्पिटलमध्ये होती आणि मी जेलमध्ये होतो. अखेरच्या काळात आईला पाहूही शकलो नाही असं सांगताना राजनाथ सिंह भावूक झाले. एका मुलाखतीत आणीबाणीचा काळ आठवताना राजनाथ सिंह यांनी हे उत्तर दिलं. 

राजनाथ सिंह म्हणाले की,  ज्या लोकांनी आणीबाणी लावून हुकुमशाही केली ते आज आमच्यावर हुकुमशाहीचा आरोप लावतायेत. आणीबाणीविरोधात आम्ही लोकांमध्ये आवाज उचलत होतो, त्यामुळे आम्हाला जेलमध्ये टाकलं गेले. २७ दिवस आई वाराणसीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. तरीही मला तिला भेटू दिलं नव्हतं. आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही मला जावू दिले नाही असं त्यांनी म्हटलं.

...तर भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार

आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील प्रचारावेळी चीन आणि पाकिस्तान यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यात दहशतवादाच्या मुद्द्यावरून राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला मदतीची ऑफर दिली आहे. ANI न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ यांनी जर पाकिस्तान दहशतवाद्यांशी लढण्यात असक्षम असेल तर भारत दहशतवाद रोखण्यासाठी त्यांची मदत करायला तयार आहे असं मोठं विधान त्यांनी केले आहे.राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान जर दहशतवादाचा आधार घेत भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. पाकिस्ताननं दहशतवादावर नियंत्रण मिळवावं. पाकिस्तान जर दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असेल तर शेजारील देश भारताची मदत घेऊ शकते. दहशतवाद थांबवण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे असं त्यांनी म्हटलं.  

चीनवर थेट निशाणा

जर भारतानं चीनच्या प्रदेशांची नावे बदलली त्याचा अर्थ तो भाग भारताचा बनला असं होत नाही. अरुणाचलमध्ये नामसाई परिसरात एका निवडणूक रॅलीत राजनाथ सिंह यांनी चीनला फटकारत जमिनीवरील वस्तूस्थिती बदलणार नसल्याचं स्पष्ट केले. जोपर्यंत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आहे तोपर्यंत देशातील जमिनीचा एक इंचही कब्जा करू शकणार नाही. पीओके आमचे होते आणि ते कायम राहील असं राजनाथ यांनी ठणकावलं. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस