शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही सोडलं नव्हतं; आणीबाणीच्या आठवणीत राजनाथ सिंह भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 14:03 IST

Loksabha Election 2024: देशातील लोकशाही धोक्यात आहे असा आरोप करणाऱ्या विरोधकांना राजनाथ सिंह यांनी आणीबाणीतील आठवण सांगितलं, जेलमध्ये असताना आईचं निधन झालं, तिच्या अंत्यविधीलाही पेरोल दिला नव्हता असं त्यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - Rajnath Singh on Emergency ( Marathi News ) माझ्या आईला ब्रेन हॅमरेज झालं होतं, तेव्हा काँग्रेस सरकारनं मला पेरोलही दिली नव्हती. मला माझ्या आईच्या अंत्ययात्रेलाही जाता आलं नव्हतं. २७ दिवस माझी आई हॉस्पिटलमध्ये होती आणि मी जेलमध्ये होतो. अखेरच्या काळात आईला पाहूही शकलो नाही असं सांगताना राजनाथ सिंह भावूक झाले. एका मुलाखतीत आणीबाणीचा काळ आठवताना राजनाथ सिंह यांनी हे उत्तर दिलं. 

राजनाथ सिंह म्हणाले की,  ज्या लोकांनी आणीबाणी लावून हुकुमशाही केली ते आज आमच्यावर हुकुमशाहीचा आरोप लावतायेत. आणीबाणीविरोधात आम्ही लोकांमध्ये आवाज उचलत होतो, त्यामुळे आम्हाला जेलमध्ये टाकलं गेले. २७ दिवस आई वाराणसीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. तरीही मला तिला भेटू दिलं नव्हतं. आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही मला जावू दिले नाही असं त्यांनी म्हटलं.

...तर भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार

आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील प्रचारावेळी चीन आणि पाकिस्तान यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यात दहशतवादाच्या मुद्द्यावरून राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला मदतीची ऑफर दिली आहे. ANI न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ यांनी जर पाकिस्तान दहशतवाद्यांशी लढण्यात असक्षम असेल तर भारत दहशतवाद रोखण्यासाठी त्यांची मदत करायला तयार आहे असं मोठं विधान त्यांनी केले आहे.राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान जर दहशतवादाचा आधार घेत भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. पाकिस्ताननं दहशतवादावर नियंत्रण मिळवावं. पाकिस्तान जर दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असेल तर शेजारील देश भारताची मदत घेऊ शकते. दहशतवाद थांबवण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे असं त्यांनी म्हटलं.  

चीनवर थेट निशाणा

जर भारतानं चीनच्या प्रदेशांची नावे बदलली त्याचा अर्थ तो भाग भारताचा बनला असं होत नाही. अरुणाचलमध्ये नामसाई परिसरात एका निवडणूक रॅलीत राजनाथ सिंह यांनी चीनला फटकारत जमिनीवरील वस्तूस्थिती बदलणार नसल्याचं स्पष्ट केले. जोपर्यंत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आहे तोपर्यंत देशातील जमिनीचा एक इंचही कब्जा करू शकणार नाही. पीओके आमचे होते आणि ते कायम राहील असं राजनाथ यांनी ठणकावलं. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस