शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

जाणून घ्या, मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या 'अमीट शाई'विषयक रंजक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 1:21 PM

निवडणूक आयोगाला दोन वेळा मतदान करण्याची तक्रारी मिळाल्या, त्यानंतर निवडणूक आयोगाने अशा समस्या सोडविण्यासाठी पर्यायांचा शोध घेतला. यामध्ये सर्वात चांगला पर्याय म्हणजे अमिट शाईचा होता.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यांतील निवडणुकीसाठी अनेकांनी आपले नामनिर्देशन सादर केले आहे. निवडणूक म्हणजे दर पाच वर्षांनी येणारा लोकशाहीचा उत्सवच. या निवडणुकीत एक गोष्ट फार महत्त्वाची असते. ती म्हणजे मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई. या शाईविषयी अनेक गंमतीदार गोष्टी आहोत.

भारत स्वातंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा १९५१-५२ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर शाई लावण्याची पद्धत नव्हती. परंतु, निवडणूक आयोगाला दोन वेळा मतदान करण्याची तक्रारी मिळाल्या, त्यानंतर निवडणूक आयोगाने अशा समस्या सोडविण्यासाठी पर्यायांचा शोध घेतला. यामध्ये सर्वात चांगला पर्याय म्हणजे अमिट शाईचा होता.

शाईसाठी घेतली 'एनपीएल'ची मदत

शाई तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यावेळी नॅशनल फिजीकल लॅबोरटरी ऑफ इंडियाला (एनपीएल) एक विशिष्ट प्रकारची शाई बनविण्याच्या सूचना केल्या. तसेच ती शाई पाण्याने किंवा कुठल्याही केमिकलने धुतली जाऊ नये, अशा सुचना केल्या होत्या. त्यानंतर एनपीएलने म्हैसूर पेंट अॅन्ड वार्निश कंपनीला तशी शाई बनविण्याची ऑर्डर दिली होती.

शाईचा पहिल्यांदा वापर

१९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अमिट शाईचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. तेव्हापासून ही शाई प्रत्येक निवडणुकीत वापरण्यात येते. मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावण्याचा अर्थ असा होतो की, मतदाराने आधी मतदान केले आहे. बोटाला लावलेली ही शाई तब्बल १५ दिवस पुसली जात नाही, हे विशेष.

उन्हात आणखीनच घट्ट होते शाई

निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या शाईचा फॉर्म्युला एनपीएल आणि म्हैसूर पेंट अॅन्ड वार्निश कंपनीने गुप्त ठेवला आहे. याचा फॉर्म्युला जाहीर केल्यास ती मिटविण्यासाठी लोक नवीन फॉर्म्युला शोधून काढतील, अशी शका निवडणूक आयोगाला आहे. जाणकारांच्या मते या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट मिसळलेले असते. त्यामुळे उन्हात येताच ही शाई आणखी घट्ट होते.

अनेक देशांमध्ये या शाईचा वापर

जगभरात तब्बल २८ देशांमध्ये अमिट शाईचा वापर करण्यात येतो. यामध्ये तुर्की, नायजेरीया, अफगानिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, घाना, कॅनडा, मलेशिया, मालदीव आणि कंबोडीया यासारख्या अनेक देशांचा समावेश आहे. कंबोडीया आणि मालदीवमध्ये मतदान केल्यानंतर मतदाराचे बोटच शाईमध्ये बुडविण्यात येते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकIndiaभारत