शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

Lok Sabha Election 2019 : गोविंदा चालला, तशी उर्मिला चालेल का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 15:55 IST

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षांतर आणि पक्षप्रवेशाचे सोहळे रंगताना दिसत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत संपली आहे. परंतु, निवडणुकीच्या पुढील टप्प्यांतील मतदानासाठी अजुनही पक्षप्रवेश सुरूच आहेत. त्यात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे नाव जोडले गेले आहे. उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

याआधी अभिनेता गोविंदा याने देखील काँग्रेसकडून मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी गोविंदाने भाजपचे दिग्गज राम नाईक यांना पराभूत केले होते. आता उर्मिला निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतानाच ती देखील गोविंदा सराखी विजयी सुरुवात करणार का, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांना लागली आहे.

राजकारण आणि सिने कलाकारांचा संबंध बऱ्याच वर्षांपासून चालत आला आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. यापैकी अनेकांनी बॉलिवूडसोडल्यानंतर अखेरच्या श्वासपर्यंत राजकारण सोडले नाही. तर अनेक कलाकार असे आहेत, ज्यांचे मन राजकारणात अधिक काळ रमले नाही. यामध्ये सर्वप्रथम नाव येते गोविंदाचे. अभिनेता गोविंदा याने त्याकाळी भाजपचे तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा उत्तर मुंबईतून पराभव करत विजयाची नोंद केली होती. मात्र गोविंदाची राजकीय कारकिर्द फारशी बहरली नाही. याउलट संसदेत गैरहजर राहण्यावरूनच त्याच्यावर टीका झाली. उर्मिलाच्या बाबतीत ही असंच होईल का, उर्मिला राजकारणाला पूर्ण वेळ देईल का, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. उर्मिलाने आपल्या अभिनयाने बराच काळ बॉलिवूडवर राज्य केले आहे. आता ती उर्मिला आपल्या राजकीय इनिंगसाठी सज्ज झाली आहे.

 

मराठमोळ्या उर्मिलाला काँग्रेस उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. असं झाल्यास तिच्यासमोर भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे आव्हान असणार आहे. हा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र २००४ मध्ये अभिनेता गोविंदाने याच मतदार संघातून राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर नाईक यांचा २००९ मध्ये संजय निरुपम यांच्याकडून पराभव झाला होता. परंतु, २०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसकडे असलेला हा मतदार संघ गोपाळ शेट्टी यांनी भाजपला मिळवून दिला आहे. आता या मतदार संघातील मतदार पुन्हा एकदा शेट्टींना निवडणार की, उर्मिलाला संधी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGovindaगोविंदाUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरBJPभाजपाcongressकाँग्रेस