शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : गोविंदा चालला, तशी उर्मिला चालेल का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 15:55 IST

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षांतर आणि पक्षप्रवेशाचे सोहळे रंगताना दिसत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत संपली आहे. परंतु, निवडणुकीच्या पुढील टप्प्यांतील मतदानासाठी अजुनही पक्षप्रवेश सुरूच आहेत. त्यात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे नाव जोडले गेले आहे. उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

याआधी अभिनेता गोविंदा याने देखील काँग्रेसकडून मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी गोविंदाने भाजपचे दिग्गज राम नाईक यांना पराभूत केले होते. आता उर्मिला निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतानाच ती देखील गोविंदा सराखी विजयी सुरुवात करणार का, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांना लागली आहे.

राजकारण आणि सिने कलाकारांचा संबंध बऱ्याच वर्षांपासून चालत आला आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. यापैकी अनेकांनी बॉलिवूडसोडल्यानंतर अखेरच्या श्वासपर्यंत राजकारण सोडले नाही. तर अनेक कलाकार असे आहेत, ज्यांचे मन राजकारणात अधिक काळ रमले नाही. यामध्ये सर्वप्रथम नाव येते गोविंदाचे. अभिनेता गोविंदा याने त्याकाळी भाजपचे तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा उत्तर मुंबईतून पराभव करत विजयाची नोंद केली होती. मात्र गोविंदाची राजकीय कारकिर्द फारशी बहरली नाही. याउलट संसदेत गैरहजर राहण्यावरूनच त्याच्यावर टीका झाली. उर्मिलाच्या बाबतीत ही असंच होईल का, उर्मिला राजकारणाला पूर्ण वेळ देईल का, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. उर्मिलाने आपल्या अभिनयाने बराच काळ बॉलिवूडवर राज्य केले आहे. आता ती उर्मिला आपल्या राजकीय इनिंगसाठी सज्ज झाली आहे.

 

मराठमोळ्या उर्मिलाला काँग्रेस उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. असं झाल्यास तिच्यासमोर भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे आव्हान असणार आहे. हा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र २००४ मध्ये अभिनेता गोविंदाने याच मतदार संघातून राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर नाईक यांचा २००९ मध्ये संजय निरुपम यांच्याकडून पराभव झाला होता. परंतु, २०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसकडे असलेला हा मतदार संघ गोपाळ शेट्टी यांनी भाजपला मिळवून दिला आहे. आता या मतदार संघातील मतदार पुन्हा एकदा शेट्टींना निवडणार की, उर्मिलाला संधी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGovindaगोविंदाUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरBJPभाजपाcongressकाँग्रेस