शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

लालूंना जेलमध्‍ये पाठवण्‍यामागे नितीश कुमार व भाजपचा हात ; तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 15:14 IST

तेजस्वी यादव यांनी नितेश कुमार आणि भाजपला आपल्या वडीलांना जेलमध्ये पाठवण्यासाठी जवाबदार असल्याचे आरोप केले आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना जेलमध्‍ये पाठवण्‍यामागे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपची मिलीभगत असल्‍याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्‍वी यादव यांनी केला आहे. नितीश कुमार व भाजप यांच्यावर तेजस्‍वी यांनी जोरदार निशाणा साधला. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी हे आरोप केले आहे.

लालू प्रसाद यादव यांनी कितीही प्रयत्‍न केले तरी ते जेलमधून बाहेर येऊ शकत नाहीत. न्‍यायालयाने त्‍यांना शिक्षा सुनावली आहे. मात्र बाहेर येण्‍यासाठी ते सारखे प्रयत्‍न करत आहेत. त्‍यांच्‍या या प्रयत्‍नास कधीच यश येणार नाही. असे वक्तव्य बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी नालंदा येथे केले होते. यावरूनच तेजस्वी यादव यांनी नितेश कुमार आणि भाजप आपल्या वडीलांना जेलमध्ये पाठवण्यासाठी जवाबदार असल्याचे आरोप केले आहे.

 

नितीश कुमार व भाजपच्‍या नेत्‍यांनी मिळून लालू प्रसाद यांना जेलमध्‍ये पाठवले आहे. आम्‍ही यासंबंधी उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबतीत जो निर्णय होईल तो नितीश कुमार किंवा नरेंद्र मोदी यांचा नसेल तर तो न्‍यायालयाचा असेल. तसेच २०१५ मध्ये नितेश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांचे कश्यासाठी पाय धरले होते असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला.

बिहारमध्ये सातव्या टप्प्यात एकूण ८ लोकसभा मतदार संघात निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी बिहार मधील राजकीय वातावरण तापत आहे. लोकसभा निवडणुकात राजद व काँग्रेस बरोबर अन्य लहान पक्ष एकत्र आहेत. नितीश व भाजप दुसऱ्या बाजूला आहेत. तीन वर्षांपूर्वी भाजपला पराभूत करणारा लालू प्रसादांचा राष्ट्रीय म्हणवणारा प्रादेशिक पक्ष ते तुरुंगात असताना यंदा कितपत प्रभाव पाडतो, हे पाहायला हवे.

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवBJPभाजपाBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019