शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
6
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
7
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
8
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
9
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
10
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
12
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
13
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
14
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
15
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
16
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
17
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
18
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
19
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
20
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?

लालूंचा विश्वास सार्थ ठरविण्यात तेजस्वी अपयशी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 15:35 IST

बिहारमध्ये भाजप, जदयू आणि लोजपा यांची युती मजबूत स्थितीत आहे. तर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-रालोसपा-हम-आरएलएसपी आणि व्हीआयपी यांची महाआघाडी पूर्णपणे अपयशी ठरण्याची शक्यता आहे.

- राजा मानेमुंबई - लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान रविवारी संपन्न झाले. त्यानंतर काही वेळातच वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल धडकले. या एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएला बहुमत तर महाआघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचे आकडे समोर आले आहेत. बिहारध्ये 'एनडीए'चे पारडे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असून लालू प्रसाद यादव यांच्या भवितव्यावर देखील चर्चा रंगत आहे.सर्वाधिक आश्चर्यचकीत करणारे एक्झिट पोल बिहारमधून आले आहेत. येथे भाजप, जदयू आणि लोजपा यांची युती मजबूत स्थितीत आहे. तर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-रालोसपा-हम-आरएलएसपी आणि व्हीआयपी यांची महाआघाडी पूर्णपणे अपयशी ठरण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलची आकडेवारी निकालात खरी ठरली तर भाजप आणि नितीश कुमार यांची दोस्ती आणखीनच घट्ट होणार आहे.

लालू प्रसाद यादव कारागृहात गेल्यानंतर महायुतीचे नेतृत्व तेजस्वी यादव करत आहेत. मात्र एक्झिट पोलमुळे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 'राजद'कडून पक्षाचे नेतृत्व तेजस्वी यांच्याकडे देण्यात आले आहे. तेजस्वी यादव प्रथमच लालू यांच्या गैरहजेरीत निवडणूक लढवत आहेत. त्यांना या निवडणुकीत पक्षात आणि कुटुंबात देखील मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. मात्र याचा सामना करत तेजस्वी यांनी लालूंच्या पावलावर पाउल ठेवत सामाजिक न्यायाला आपला प्रमुख मुद्दा बनवलं.

तेजस्वी यांनी काँग्रेससह इतर पक्षांना सोबत घेत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र तेजस्वी यांची मात्र भाजपच्या चक्रव्युहाला भेदताना दिसून येत नाही. ज्याप्रमाणे लालू यांनी विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या साथीत भाजपला दूर ठेवले होते, तसा चमत्कार तेजस्वी यांना करता येईल, अशी शक्यता कमीच आहे.एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मोदी-नितीश-पासवान यांच्यासमोर तेजस्वीचे नेतृत्व कमकुवत दिसून आले. तसेच राहुल गांधी यांच्याशी केलेली मैत्री देखील तेजस्वी यांच्यासाठी फायदेशीर ठरताना दिसत नाही. महाआघाडीची बोलणी सुरू असतानाच लालूंच्या गैरहजेरीमुळे जागावाटपावरून बरीच ओढातान झाली. याचं नुकसान महाआघाडीलाच झाले असून तेजस्वी यांची सुरुवातच काहीशी वाईट झाली होती.दरम्यान लालू यादव यांना षडयंत्र रचून कारागृहात टाकल्याचा मुद्दा तेजस्वी यांच्यासह राबडीदेवी आणि मीसा भारती यांनी जनतेसमोर मांडला. मात्र एक्झिट पोलवरून हा भावनात्मक मुद्दा देखील उपयोगी ठरला नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस-राजदमधील अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत आहेत. तर महाआघाडीतील इतर पक्षांच्या विजयाची धुसर शक्यता आहे. परंतु, महाआघाडीतील प्रत्येक उमेदवाराचा विजय तेजस्वी यांच्या राजकीय कारकिर्दीचे भविष्य ठरवणारा आहे. पुढीलवर्षी लगेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक तेजस्वी यांच्यासाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा