शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'लोकसभा निवडणुकीत भाजपला २०१४ पेक्षा मोठे यश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 17:11 IST

देशातील जनता नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवू इच्छिते. एनडीए सरकारने देशातील महागाईवर नियंत्रण मिळविल्याचा दावा यावेळी राजनाथ सिंह यांनी केला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा नसल्याचे सांगत, ते म्हणाले की सरकारने प्रत्येक घटकासाठी काम केले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान शिल्लक असून अर्ध्यापेक्षा अधिक लढाई पार पडली आहे. मात्र सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. यामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील सामील झाले आहे. राजनाथ यांनी दावा केला की, भाजपला २०१४ पेक्षा यावेळी अधिक जागा मिळतील. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेते ते बोलत होते.

देशातील जनता नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवू इच्छिते. एनडीए सरकारने देशातील महागाईवर नियंत्रण मिळविल्याचा दावा यावेळी राजनाथ सिंह यांनी केला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा नसल्याचे सांगत, ते म्हणाले की सरकारने प्रत्येक घटकासाठी काम केले. भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यामुळे भाजपला २०१४ पेक्षा अधिक जागा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळतील.

भाजपसाठी तीन मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये अंत्योदय, दुसरा देशाचा विकास आणि तिसरा म्हणजे देशाची सुरक्षा. या तीनही आघाड्यांवर भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. याचा परिणाम ग्राउंड लेव्हलला दिसून येत, असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. पंतप्रधानपदाचा तुमचा उमेदवार कोण, असा सवाल राजनाथ यांनी विरोधकांना केला. लोकशाहीत मतदारांना अंधारात ठेवणे योग्य नसल्याचे सांगत राजनाथ सिंह म्हणाले, पूर्वीच्या युपीए आणि आताच्या एनडीए सरकारच्या कामाची तुलना केल्यास फरक स्पष्ट दिसून येतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी