शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

'लोकसभा निवडणुकीत भाजपला २०१४ पेक्षा मोठे यश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 17:11 IST

देशातील जनता नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवू इच्छिते. एनडीए सरकारने देशातील महागाईवर नियंत्रण मिळविल्याचा दावा यावेळी राजनाथ सिंह यांनी केला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा नसल्याचे सांगत, ते म्हणाले की सरकारने प्रत्येक घटकासाठी काम केले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान शिल्लक असून अर्ध्यापेक्षा अधिक लढाई पार पडली आहे. मात्र सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. यामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील सामील झाले आहे. राजनाथ यांनी दावा केला की, भाजपला २०१४ पेक्षा यावेळी अधिक जागा मिळतील. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेते ते बोलत होते.

देशातील जनता नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवू इच्छिते. एनडीए सरकारने देशातील महागाईवर नियंत्रण मिळविल्याचा दावा यावेळी राजनाथ सिंह यांनी केला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा नसल्याचे सांगत, ते म्हणाले की सरकारने प्रत्येक घटकासाठी काम केले. भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यामुळे भाजपला २०१४ पेक्षा अधिक जागा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळतील.

भाजपसाठी तीन मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये अंत्योदय, दुसरा देशाचा विकास आणि तिसरा म्हणजे देशाची सुरक्षा. या तीनही आघाड्यांवर भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. याचा परिणाम ग्राउंड लेव्हलला दिसून येत, असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. पंतप्रधानपदाचा तुमचा उमेदवार कोण, असा सवाल राजनाथ यांनी विरोधकांना केला. लोकशाहीत मतदारांना अंधारात ठेवणे योग्य नसल्याचे सांगत राजनाथ सिंह म्हणाले, पूर्वीच्या युपीए आणि आताच्या एनडीए सरकारच्या कामाची तुलना केल्यास फरक स्पष्ट दिसून येतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी