शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

वाराणसीतून प्रियंका गांधींच्या माघारीमुळे भाजपचेच नुकसान ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 18:00 IST

उत्तर प्रदेशातील ग्राउंड रिपोर्ट पाहिल्यास, समाजवादी पक्ष आणि बसपाने भाजपसमोर खडतर आव्हान उभे केले आहे. अनेक जागांवर दोन्ही पक्ष भाजपपेक्षा मजबूत आहेत. सपा, बसपाच्या जातीच्या समीकरणांना शह देण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणूक मोदीविरुद्ध इतर अशी केली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीमधून निवडणूक लढविण्यासाठी प्रियंका गांधी यांनी माघार घेतली. मात्र या माघारीची नवनवीन कारणे समोर येत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी प्रियंका यांना पाठिंबा देण्यास विरोध दर्शविला होता. मात्र येथील राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती पाहिल्यास प्रियंका यांच्या माघारीचे कारण वेगळेच असल्याचे स्पष्ट होत आहे.

उत्तर प्रदेशातील ग्राउंड रिपोर्ट पाहिल्यास, समाजवादी पक्ष आणि बसपाने भाजपसमोर खडतर आव्हान उभे केले आहे. अनेक जागांवर दोन्ही पक्ष भाजपपेक्षा मजबूत आहेत. सपा, बसपाच्या जातीच्या समीकरणांना शह देण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणूक मोदीविरुद्ध इतर अशी केली आहे. त्यामुळे प्रत्येक सभेत भाजपकडून सर्व जागांवर नरेंद्र मोदीच उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांच्या आगमणाने उत्तर प्रदेशातील लढाई त्रिकोणी झाल्याचे चित्र आहे. याचा लाभ भाजपला होण्याची शक्यता आहे.

वाराणसीच्या कक्षेत उत्तर प्रदेशातील २६ आणि बिहारमधील ६ जागा येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवून या ३२ जागांवर लक्ष ठेवतात. २०१४ मध्ये भाजपने ही चाल खेळली होती. त्यावेळी भाजपला ३२ पैकी ३१ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी जातीच्या समीकरणांमुळे भाजपसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच प्रियंका यांनी येथून निवडणूक लढवली असती तर सहाजिकच काँग्रेसचे ३२ जागांवरील वर्चस्व वाढले असते. मात्र बसपा आणि सपाच्या मतांमध्ये विभाजन झाले असते. याचा फायदा भाजपलाच मिळाणार होता. या ३२ पैकी काही जागांवर काँग्रेस मजबूत असून येथील उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. भाजपला होणारा फायदा पाहता प्रियंका यांनी माघार घेतली. त्यामुळे प्रियंका यांची माघार भाजपसाठी नुकसान करणारी असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

दरम्यान वाराणसी मतदार संघातून निवडणुकीच्या रणांगणात प्रियंका यांना न उतरविण्याची योजना किती यशस्वी होणार हे येणारा काळच सांगणार आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या २०२२ मधील विधानसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसकडून सुरू करण्यात आली हे देखील तेवढंच खर आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी