शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा : नवजोत सिद्धू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 10:46 IST

मौलाना आझाद आणि महात्मा गांधीं यांचा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी तुम्हाला गोऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, आता तुम्हाला काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपवर टीका केली.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील उरलेल्या दोन टप्प्यातील मतदान १२ आणि १९ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दीक चकमक वाढली आहे. काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी केले आहे. इंदुर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार पंकज संघवी यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे ज्याने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. मौलाना आझाद आणि महात्मा गांधीं यांचा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी तुम्हाला गोऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, आता तुम्हाला काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपवर टीका केली.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला चौकीदार म्हणतात. मात्र, चौकीदार गरिबांचे दार सोडून अंबानींच्या दारासमोर उभा राहतो. काँग्रेसने आतापर्यंत देशाला ५ गांधी दिले. भाजपने मात्र, नीरव मोदी, ललित मोदी आणि तिसरा नरेंद्र मोदी असे भगोडे लोक दिले असल्याचे सिद्धू म्हणाले.

इंदुर लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी मतदान होणारा आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना २०१४ मध्ये भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, यावेळी त्यांच्या जागी शंकर लालवाणी यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसSumitra Mahajanसुमित्रा महाजन