शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मसूद अजरला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइकची गरज पडली नसती : दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 12:12 PM

पाकिस्तान मधील स्थायिक असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला जर प्रज्ञा सिंह यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असा खोचक टोला दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना लागवला.

मुंबई - जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला शाप दिला असता तर भारताला सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असे म्हणत भोपाळ मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. भोपाळ येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

शहीद हेमंत करकरे यांना आपण शाप दिल्यानेच त्यांचा सर्वनाश झाला, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. पाकिस्तान मध्ये लपवून  बसलेला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला जर प्रज्ञा सिंह यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असा खोचक टोला दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना लागवला.

दहशतवादी नरकात जाऊन जरी लपले, तरीही आम्ही त्यांना शोधून काढू असे देशाचे पंतप्रधान म्हणाले होते. पुलवमा, पठाणकोट आणि उरी मधील हल्ले झाल्यावर पंतप्रधान कुठे गेले असा सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला. भारतात नेहमीच होणाऱ्या दहशतवादी हल्ले कधी थांबतील अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माझी उमेदवारी जाहीर झाल्याने माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण घाबरले आहेत. उमा भारतींनी निवडणुकीत उतरण्यास नकार दिला. अखेर शेवटच्या दिवशी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी दाखल केली, अशा शब्दात दिग्विजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDigvijaya Singhदिग्विजय सिंहSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाUma Bhartiउमा भारती