शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

'फिर एक बार, स्वबळाचं सरकार'; अमित शहांनी सांगितला भाजपाचा 'आकडा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 12:43 IST

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा हा टप्पा सर्वच पक्षांसाठी 'लास्ट बट नॉट द लीस्ट' स्वरूपाचा आहे.

ठळक मुद्दे येत्या १९ तारखेला उर्वरित ५९ जागांवर मतदान होणार आहे. भाजपानं सहाव्या टप्प्यातच बहुमताचा आकडा पार केला असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. हा आकडा रालोआतील मित्रांचं टेन्शन वाढवणारा आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झालेत. ५४३ पैकी ४८४ मतदारसंघांमध्ये उमेदवारांचं भवितव्य यंत्रबद्ध झालं आहे. आता येत्या १९ तारखेला उर्वरित ५९ जागांवर मतदान होणार आहे. त्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, मध्य प्रदेशातील ८ जागांचा समावेश आहे. स्वाभाविकच, हा टप्पा सर्वच पक्षांसाठी 'लास्ट बट नॉट द लीस्ट' स्वरूपाचा आहे. परंतु, भाजपानं सहाव्या टप्प्यातच बहुमताचा आकडा पार केला असल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. त्यांनी सांगितलेला आकडा रालोआतील मित्रांचं टेन्शन वाढवणारा आहे. 

'सातव्या टप्प्यानंतर भाजपा ३००चा आकडा ओलांडेल. सहाव्या टप्प्यातच आम्ही २७२ ची 'मॅजिक फिगर' गाठली आहे. त्यामुळे यावेळीही भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल', असं अमित शहा यांनी ठामपणे सांगितलं. देशभरात दौरे केल्यानंतर जे चित्र पाहिलं, त्या आधारे आपण हा अंदाज बांधत असल्याचं त्यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी यांची 'दीदीगिरी' असलेल्या पश्चिम बंगालमध्येही ४२ पैकी २३ हून अधिक जागांवर 'कमळ' फुलेल, असंही त्यांनी सांगितलं. 

अमित शहा यांनी सांगितलेला आकडा विरोधकांपेक्षा त्यांच्या 'मित्रां'नाच धडकी भरवणारा आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपाने २८२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांना सरकारस्थापनेसाठी कुणाचीच मदत घ्यावी लागली नव्हती. त्यामुळे पाच वर्षं एनडीएतील अन्य पक्षांची कोंडीच झाली होती. राज्यसभेत संख्याबळ कमी असल्यानं ते मित्रांना धरून होते, पण एरवी सगळा आनंदच होता. यावेळी भाजपाच्या जागा कमी होतील आणि मोदी-शहांना मित्रांना सन्मान द्यावा लागेल, असं जाणकारांचं गणित आहे. त्यामुळे मित्रपक्षांनाही थोडा दिलासा मिळाला होता. परंतु, अमित शहांनी त्यांना पुन्हा काळजीत टाकलंय. 

दीदी, स्वतःला देव समजू नका!

दरम्यान, अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमधील रोड शोला हिंसक वळण लागलं होतं. दगडफेक, जाळपोळीचे प्रकार घडले होते. हा हिंसाचार ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसनेच घडवल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. 'आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण कुठेच हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल काँगेस नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला, तो केवळ तृणमूल सत्तेत असल्यानेच, असं शरसंधान शहांनी केलं. दीदी, तुम्ही स्वतःला देव समजू नका. तुमचं शासन जनताच संपवेल, असंही त्यांनी सुनावलं. भर भाषणात बदला घेण्याची धमकी देणाऱ्या ममतादीदींवर निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केलेली नाही, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही शहांनी केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Mamata Banerjeeममता बॅनर्जी