शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

बिर्याणीवरुन हाणामारी; नऊ काँग्रेस कार्यकर्त्यांना घडली तुरुंगवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 16:23 IST

उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे.बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.34 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. 

मुझफ्फरनगर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीकाटिप्पणीसुद्धा केली जाऊ लागली आहे. तसेच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.

काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत आखला होता. त्यानुसार बिर्याणीही दिली. पण बिर्याणी खाण्यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये अनेक समर्थक जखमी झाले. या प्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (6 एप्रिल) माजी आमदार मौलाना जमील यांच्या घरी प्रचार सभा आयोजित केली होती. बिजनौर मतदारसंघातील काकरौली ठाण्याच्या हद्दीतील टडहेडा गावात ही सभा आयोजित करण्यात आली होती. प्रचार सभेनंतर दुपारी  समर्थकांसाठी जेवण ठेवण्यात आलं होतं. यामध्ये समर्थकांना बिर्याणी देण्यात येणार होती. पण बिर्याणी घेण्यावरून उपस्थित समर्थकांमध्ये हाणामारी झाली. 

गावातील लोकांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळाने पुन्हा वाद झाला. दोन्ही गटांनी काठ्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. बिर्याणी कमी पडल्यामुळे हा वाद सुरू झाल्याची माहिती काही गावकऱ्यांनी दिली. या हाणामारीमध्ये अनेक समर्थक जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने हजर झाले. तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करून समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. विभागीय अधिकारी राम मोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आचारसंहितेचं उल्लंघन आणि विविध कलमांखाली 34 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.' 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक