शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

बिर्याणीवरुन हाणामारी; नऊ काँग्रेस कार्यकर्त्यांना घडली तुरुंगवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 16:23 IST

उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे.बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.34 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. 

मुझफ्फरनगर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीकाटिप्पणीसुद्धा केली जाऊ लागली आहे. तसेच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.

काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत आखला होता. त्यानुसार बिर्याणीही दिली. पण बिर्याणी खाण्यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये अनेक समर्थक जखमी झाले. या प्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (6 एप्रिल) माजी आमदार मौलाना जमील यांच्या घरी प्रचार सभा आयोजित केली होती. बिजनौर मतदारसंघातील काकरौली ठाण्याच्या हद्दीतील टडहेडा गावात ही सभा आयोजित करण्यात आली होती. प्रचार सभेनंतर दुपारी  समर्थकांसाठी जेवण ठेवण्यात आलं होतं. यामध्ये समर्थकांना बिर्याणी देण्यात येणार होती. पण बिर्याणी घेण्यावरून उपस्थित समर्थकांमध्ये हाणामारी झाली. 

गावातील लोकांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळाने पुन्हा वाद झाला. दोन्ही गटांनी काठ्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. बिर्याणी कमी पडल्यामुळे हा वाद सुरू झाल्याची माहिती काही गावकऱ्यांनी दिली. या हाणामारीमध्ये अनेक समर्थक जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने हजर झाले. तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करून समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. विभागीय अधिकारी राम मोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आचारसंहितेचं उल्लंघन आणि विविध कलमांखाली 34 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.' 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक