शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बिर्याणीवरुन हाणामारी; नऊ काँग्रेस कार्यकर्त्यांना घडली तुरुंगवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 16:23 IST

उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे.बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.34 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. 

मुझफ्फरनगर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीकाटिप्पणीसुद्धा केली जाऊ लागली आहे. तसेच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.

काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत आखला होता. त्यानुसार बिर्याणीही दिली. पण बिर्याणी खाण्यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये अनेक समर्थक जखमी झाले. या प्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (6 एप्रिल) माजी आमदार मौलाना जमील यांच्या घरी प्रचार सभा आयोजित केली होती. बिजनौर मतदारसंघातील काकरौली ठाण्याच्या हद्दीतील टडहेडा गावात ही सभा आयोजित करण्यात आली होती. प्रचार सभेनंतर दुपारी  समर्थकांसाठी जेवण ठेवण्यात आलं होतं. यामध्ये समर्थकांना बिर्याणी देण्यात येणार होती. पण बिर्याणी घेण्यावरून उपस्थित समर्थकांमध्ये हाणामारी झाली. 

गावातील लोकांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळाने पुन्हा वाद झाला. दोन्ही गटांनी काठ्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. बिर्याणी कमी पडल्यामुळे हा वाद सुरू झाल्याची माहिती काही गावकऱ्यांनी दिली. या हाणामारीमध्ये अनेक समर्थक जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने हजर झाले. तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करून समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. विभागीय अधिकारी राम मोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आचारसंहितेचं उल्लंघन आणि विविध कलमांखाली 34 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.' 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक